शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

“२०१९ मध्येच मविआ सरकार पडले असते, अजित पवारांमुळे टिकले”: सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 12:09 IST

NCP Sunil Tatkare News: जितेंद्र आव्हाड हे बेदखल झालेले नेते आहेत, अशी टीका सुनील तटकरे यांनी केली.

NCP Sunil Tatkare News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून, अजित पवार गट आणि शरद पवार गटात संघर्ष तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला आता अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार टिकले, अन्यथा २०१९ लाच ते कोसळले असते, असे मोठे विधान सुनील तटकरे यांनी केले आहे. 

अजित पवार यांना २०१९ मध्ये उपमुख्यमंत्री केले ही चूक झाली, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यावर बोलताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, २०१९ मध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले नसते तर ते सरकारच टिकले नसते. त्यावेळी गुप्त मतदान झाले असते, तर तेव्हाच ते सरकार पडले असते. अजित पवार हे विरोधी पक्षनेते झाले ते बहुसंख्य आमदारांनी मागणी केल्यामुळे झाले. त्याहीपुढे त्यांचे ऐकले नाही म्हणूनच ५३ पैकी ४३ आमदार आता अजित पवारांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे त्यांचे सामर्थ्य संघटनेत, विधिमंडळात काय आहे हे झारखंडचे एक आमदार, नागालँडचे सात आमदारांच्या पाठिंब्यावरूनच स्पष्ट झाले आहे, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. 

जितेंद्र आव्हाड हे बेदखल झालेले नेते आहेत

निराशेच्या गर्तेत सापडलेली माणसे आणि आयुष्यभर खोटे बोलून स्वतःचे राजकीय महत्त्व वाढवलेली माणसे यापेक्षा काय बोलणार आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार. जितेंद्र आव्हाड हे बेदखल झालेले नेते आहेत, या शब्दांत सुनील तटकरे यांनी हल्लाबोल केला. तसेच राहुल गांधी यांच्या पदयात्रेनंतर आपणही पदयात्रा काढावी. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते आहोत, असे दाखवावे, या कारणासाठी काढलेल्या संघर्ष यात्रेला राहुल गांधी यांच्या पदयात्रेपेक्षा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्यामुळे कदाचित ते विश्रांतीला गेले असावेत म्हणून त्यांनी पक्षाच्या शिबिराला जाणे टाळले असेल, असा टोला सुनील तटकरे यांनी रोहित पवारांना लगावला.

दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे परभणी आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांत दोन मेळावे घेण्यात येणार असून ७ जानेवारीला मुंबई प्रदेश काँग्रेसचा तर, १८ जानेवारीला राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत एकाच वेळी महायुतीचे मेळावे होणार आहेत. राज्यात आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रमुख नेते मार्गदर्शन या मेळाव्यात करतील. याची रुपरेषा ठरवण्यासाठी ५ जानेवारीला समन्वय समिती आणि घटक मित्र पक्षाची बैठक मंत्री दादाजी भुसे यांच्या बंगल्यावर घेणार आहोत, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस