शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

गौप्यस्फोट करणार असतील, तर...; शरद पवारांचा अजितदादांसह प्रफुल पटेलांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 05:30 IST

सिंचन घोटाळ्याबाबतचे विधान पंतप्रधानांनी कोणासाठी केले?, मी प्रफुल्ल पटेल यांच्या पुस्तकाची वाट पाहतोय

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील एका सभेत सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता, तो कोणाबद्दल होता, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केला. अजित पवार यांनी मांडलेले विचार पक्षाच्या धोरणांशी विसंगत असल्याचे सांगत त्यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 

अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावर त्यांच्या पक्षाचा नेता कोण, चिन्ह कोणते असे सगळे नमूद केले आहे. भाजपला मदत करण्यासाठी लोकांनी त्यांना मते दिलेली नाहीत, असेही पवार म्हणाले. पवार यांनी आमदारांची बैठक घेतली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. अनिल देशमुख, एकनाथ खडसे, सुमन पाटील, अशोक पवार, पंडित क्षीरसागर आदी उपस्थित होते. अजित पवार यांना उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

...त्यांना मी मंत्रिपद मागेन का? माजी मंत्री अनिल देशमुख यांना मंत्री करण्यास भाजपने नकार दिला, म्हणून ते आमच्याबरोबर आले नाहीत, असे अजित पवार म्हणाले होते. त्याला खुद्द अनिल देशमुख यांनीच उत्तर दिले. ज्या पक्षाने माझी खोटी चौकशी लावून मला त्रास दिला, त्यांच्याकडे मी मंत्रिपद मागेन का? असा प्रश्न त्यांनी केला.

राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली, हे मतदारांना माहिती आहे. निवडणूक लढवताना, मते मागतानाची त्यांची भूमिका व त्यांनी आता घेतलेली भूमिका विसंगत आहे हे मात्र मला माहिती आहे. आमच्या चर्चा झाल्या; पण त्या पक्षाच्या विचारांशी, ध्येयधोरणांशी सुसंगत अशा विचारांवर झाल्या. त्यांना ज्या रस्त्यावर जायचे होते तिकडे मला आणि माझ्याबरोबर जे आहेत त्यांना जायचे नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाचा आहे हे मतदारांना चांगले माहिती आहे. अजित पवार यांची भूमिका पक्षाच्या विचारांशी विसंगत होती. लोकशाहीत त्यांना त्यांची मते मांडण्याचा अधिकार आहे, मात्र निवडून येताना लोकांना जे सांगितले त्याचे काय करणार? असा सवालही शरद पवार यांनी केला.

पक्ष सोडून का चालले हेही लिहा...खासदार प्रफुल्ल पटेल पुस्तक लिहून त्यात अनेक गौप्यस्फोट करणार असतील तर मी त्या पुस्तकाची वाट पाहतो. त्यात त्यांनी एक चॅप्टर इडीने त्यांच्या घराच्या किती मजल्यांची कशी चौकशी केली त्याविषयी असूद्या, तसेच लोक हल्ली पक्ष सोडून का चालले आहेत हेही त्यामध्ये लिहा...अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पटेल लिहिणार असल्याचा पुस्तकाची खिल्ली उडवली.

लोकच काय तो निर्णय घेतील बारामतीत किंवा कुठेही कोणालाही आपली मते, आपले विचार लोकांसमोर घेऊन जाण्याचा अधिकार आहे. त्यानंतर लोकच काय तो निर्णय घेतील, असे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारPraful Patelप्रफुल्ल पटेल