शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गौप्यस्फोट करणार असतील, तर...; शरद पवारांचा अजितदादांसह प्रफुल पटेलांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 05:30 IST

सिंचन घोटाळ्याबाबतचे विधान पंतप्रधानांनी कोणासाठी केले?, मी प्रफुल्ल पटेल यांच्या पुस्तकाची वाट पाहतोय

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील एका सभेत सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता, तो कोणाबद्दल होता, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केला. अजित पवार यांनी मांडलेले विचार पक्षाच्या धोरणांशी विसंगत असल्याचे सांगत त्यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 

अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावर त्यांच्या पक्षाचा नेता कोण, चिन्ह कोणते असे सगळे नमूद केले आहे. भाजपला मदत करण्यासाठी लोकांनी त्यांना मते दिलेली नाहीत, असेही पवार म्हणाले. पवार यांनी आमदारांची बैठक घेतली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. अनिल देशमुख, एकनाथ खडसे, सुमन पाटील, अशोक पवार, पंडित क्षीरसागर आदी उपस्थित होते. अजित पवार यांना उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

...त्यांना मी मंत्रिपद मागेन का? माजी मंत्री अनिल देशमुख यांना मंत्री करण्यास भाजपने नकार दिला, म्हणून ते आमच्याबरोबर आले नाहीत, असे अजित पवार म्हणाले होते. त्याला खुद्द अनिल देशमुख यांनीच उत्तर दिले. ज्या पक्षाने माझी खोटी चौकशी लावून मला त्रास दिला, त्यांच्याकडे मी मंत्रिपद मागेन का? असा प्रश्न त्यांनी केला.

राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली, हे मतदारांना माहिती आहे. निवडणूक लढवताना, मते मागतानाची त्यांची भूमिका व त्यांनी आता घेतलेली भूमिका विसंगत आहे हे मात्र मला माहिती आहे. आमच्या चर्चा झाल्या; पण त्या पक्षाच्या विचारांशी, ध्येयधोरणांशी सुसंगत अशा विचारांवर झाल्या. त्यांना ज्या रस्त्यावर जायचे होते तिकडे मला आणि माझ्याबरोबर जे आहेत त्यांना जायचे नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाचा आहे हे मतदारांना चांगले माहिती आहे. अजित पवार यांची भूमिका पक्षाच्या विचारांशी विसंगत होती. लोकशाहीत त्यांना त्यांची मते मांडण्याचा अधिकार आहे, मात्र निवडून येताना लोकांना जे सांगितले त्याचे काय करणार? असा सवालही शरद पवार यांनी केला.

पक्ष सोडून का चालले हेही लिहा...खासदार प्रफुल्ल पटेल पुस्तक लिहून त्यात अनेक गौप्यस्फोट करणार असतील तर मी त्या पुस्तकाची वाट पाहतो. त्यात त्यांनी एक चॅप्टर इडीने त्यांच्या घराच्या किती मजल्यांची कशी चौकशी केली त्याविषयी असूद्या, तसेच लोक हल्ली पक्ष सोडून का चालले आहेत हेही त्यामध्ये लिहा...अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पटेल लिहिणार असल्याचा पुस्तकाची खिल्ली उडवली.

लोकच काय तो निर्णय घेतील बारामतीत किंवा कुठेही कोणालाही आपली मते, आपले विचार लोकांसमोर घेऊन जाण्याचा अधिकार आहे. त्यानंतर लोकच काय तो निर्णय घेतील, असे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारPraful Patelप्रफुल्ल पटेल