शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

“धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही याचे उत्तर CM फडणवीसांना द्यावे लागेल”: सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 13:29 IST

NCP SP Group MP Supriya Sule: सरकारने थोडासा तरी संवेदनशीलपणा दाखवावा. याआधीही नैतिकतेच्या आधारे राजीनामे घेतले आहेत. पण आता धनंजय मुंडेचा राजीनामा का घेतला जात नाही, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.

NCP SP Group MP Supriya Sule: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. तर भाजपा नेते सुरेश धस हेही यावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. यात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील उपस्थित राहिले. यासंदर्भात सर्वपक्षीयांनी राज्यपालांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदनही सादर केले. यातच धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना द्यावे लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. तसेच मंत्रिमंडळ बैठकीलाही धनंजय मुंडे उपस्थित राहिले. या संदर्भात सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशमुख कुटुंबीय आणि त्यांच्या भावना, अश्रू पाहून अस्वस्थ वाटते. या सरकारने थोडासा तरी संवेदनशीलपणा दाखवावा. मुख्यमंत्री म्हणाले आहेत आम्ही कोणाला सोडणार नाही. मग, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावे लागेल. राजकारण बाजूला ठेवून माणुसकी दाखवून न्याय मिळाला पाहिजे. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले, तर आशेच किरण निर्माण झाला आहे. आता काय निर्णय मुख्यमंत्री घेतात ते बघू. याआधी ज्या वेळेस आरोप झाले, तेव्हा नैतिकतेच्या आधारे राजीनामा घेतला आहे. आता राजीनामा मागितला आहे. पण तेच घेत नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

पालकमंत्रीपदाबाबत एवढी चर्चा आम्ही कधीच ऐकली नाही

राजकारण वेगळे आणि राजकीय जबाबदारी वेगळी. कुटुंब उंबऱ्याच्या आत असते, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत अधिक काही बोलणे सुप्रिया सुळे यांनी टाळले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडून सरकारमध्ये कुणीच सक्रीय दिसत नाही. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. सगळ्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच पालकमंत्रीपदात नेमके काय आहे, त्याच्यासाठी एवढा वेळ का जात आहे. पालकमंत्रीपदाबाबत एवढी चर्चा आम्ही कधीच ऐकली नाही. एवढी रस्सीखेच का केली जाते. एवढे गूढ त्यात काय आहे, ते मला माहिती नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

दरम्यान, सरकारने सोयाबीन, कपाशीला हमीभाव देऊ असा शब्द दिला होता. सरसकट कर्जमाफी देऊ असेही सांगितले होते. राज्याने विश्वास ठेवून मतदान केले आणि त्यांना सत्ता मिळाल्यानंतर आमची एकच इच्छा आहे सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.  

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळेDhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस