शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार-अजितदादा एकत्र येण्यावर राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंनी सांगितली ‘मन की बात’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 14:35 IST

NCP SP Group Supriya Sule News: गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

NCP SP Group Supriya Sule News: नववर्षाच्या सुरुवातीला राज्यासह देशातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांनी आराध्य देवतेच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पंढरपूर येथील मंदिरात विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. राज्यातील जनता सुख-समाधानाने राहू देत, अशी दोन्ही हात जोडत प्रार्थना केली. तसेच सर्व पवार कुटुंब एकत्र येऊ देत आणि वाद संपू देत, असे साकडे विठ्ठलाचरणी घातले, असे आशाताई पवार यांनी सांगितले. यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. 

अजित पवारांनी वेगळी भूमिका घेत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील दुरावा वाढत गेल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करून सुप्रिया सुळे निवडून आल्या. विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे युगेंद्र पवारांच्या विरोधात निवडून आले. या दोन्ही निवडणुकीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळाला. यानंतर आता अजित पवार आणि शरद पवार यांनी पुन्हा एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

आशाताई पवारांना भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे

पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांना यासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, आशाताई पवारांना भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. माझ्या मनात कधीच खदखद नव्हती. लोकसभेच्या मतदानानंतरही पहिल्यांदा आशाकाकींच्या पाया पडायला गेले. मी एक लोकप्रतिनिधी आहे. मला खासगी भावना व्यक्त करण्याचा अधिकार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

दरम्यान, संपूर्ण देशात पवार कुटुंबाचे वलय खूप मोठे आहे. त्यात अचानक वेगळेपणा झाल्यामुळे प्रत्येकाला वाटते की, शरद पवारांनी गंभीर आजार असतानाही आपल्यासाठी, समाजासाठी इतकी वर्ष काम करत आहेत. अजित पवार किती कामाचे आहेत, ते फक्त महाराष्ट्र नाही, तर संपूर्ण देश मान्य करतो. शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील, दोघांना किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना लोक विनंती करत असतात. अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले पाहिजेत, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले होते. 

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार