शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 13:53 IST

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटे मोबाइलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर येताच शेतकरी नेते, विरोधकांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

Manikrao Kokate News: एकीकडे शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न यांवरून महाविकास आघाडीसह विरोधक महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाइलवर गेम खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आता यावरून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधकांकडून चौफेर टीकेचा भडिमार होताना पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या सभागृहात बसून माणिकराव कोकाटे मोबाइलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर येताच शेतकरी नेतेही चांगलेच संतापले आहेत.

सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची   “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. तसेच “#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!” #कधी_शेतीवर_या_महाराज #खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या, असे हॅशटॅगही दिले आहेत.

शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक फोटो पोस्ट करत माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला. शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी एक फोटो शेअर करत टीका केली. कृषिमंत्री किती बेजबाबदार आहेत याचे हे उदाहरण आहे परंतु हे पहिले नाही. याच कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्यासोबत केली. शेतकरी कर्जमाफीचा पैसा लग्नात, साखरपुड्यात उधळतात असे बोलले आणि आता हा माणूस विधानसभा सभागृहात रमी खेळत असेल तर त्यांची तुलना कुणासोबत करायची, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना अशी माणसं चालतातच कशी? या महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाला आहे. दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या करतायेत. यांना लाज कशी वाटत नाही, असा घणाघात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केला.

शेतकऱ्यांचे दुर्दैव, कृषीमंत्रीच रम्मी खेळत आहे

शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. कृषीमंत्रीच रम्मी खेळत आहे. शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात त्यांनी विधानसभेत समिती गठीत गेली. शेतकरी आत्महत्या होणार नाही, यासाठी काय उपाययोजना करता येतील, म्हणून ती समिती काम करणार आहे. आमच्या कृषीमंत्र्यांची ही आठवी ते नववी चूक असेल. यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या? इकडे शेतकऱ्यांना सांगायचे की, तुम्ही दारू पिता, लग्नात खर्च होतो म्हणून तुमच्यावर कर्ज होत आहे आणि आमचा कृषीमंत्रीच रमी खेळत असेल, तर आमच्या शेतकऱ्यांचे भले काय होईल, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

दरम्यान, शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रम्मी खेळतोय. या खोटारड्या, धोकेबाज सरकारला शेतकऱ्यांशी काही देणेघेणे राहिले नाही, म्हणून माझे शेतकरी बांधवांना आवाहन आहे यांना धडा शिकवा. भाजपवाल्यानी कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केले आहे. त्यामुळे यांना काम उरलेले नाही, म्हणून ते रमी खेळत आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी अवस्था झाली आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाडBacchu Kaduबच्चू कडूVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार