शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

“आता भाषण करायची इच्छा नाही, हे चालणार नाही”; जयंत पाटील संतापले, नेमके काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 11:08 IST

NCP SP Group Jayant Patil News: माझ्या भाषणाचे काही फार महत्त्व नाही. असे राजकारण असते का? किती अतिरेक? ही काय पद्धत आहे? असे सांगत जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला.

NCP SP Group Jayant Patil News: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लाडकी बहीण योजना अधिक प्रभावीपणे सरकारला राबवायची आहे, त्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या बैठका, सभा यांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते लोकसभेची पुनरावृत्ती करण्यास इच्छुक आहेत. यातच आता मला भाषण करण्याची इच्छा नाही. ही योग्य पद्धत नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवस्वराज्य यात्रेसाठी शरद पवार गटाची नेतेमंडळी राज्यात सभा घेत आहेत. यातील एका सभेत संबोधित करण्यासाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि पक्षाचे इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते. इतर नेत्यांचे भाषण सुरू असताना अचानक समोरच्या लोकांनी अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली. एका अज्ञात व्यक्तीने हातात धरलेल्या पोस्टरवरून गोंधळाला सुरुवात झाल्याचे समजते. यावरून जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. 

मला आता भाषण करायची इच्छा नाही, हे चालणार नाही

कुणीतरी कुठेतरी एक पोस्टर हातात धरले म्हणून इथे दंगा करायची काय गरज आहे? काय चालले आहे? असे राजकारण असते का? किती अतिरेक? ही काय पद्धत आहे? मला तुमच्यासमोर भाषण करण्याची इच्छा नाही. मला हे चालत नाही. ही पद्धत नाही. आता उशीर झाला आहे. माझ्या भाषणाचे काही फार महत्त्व नाही. आपण आता सभा थांबवणे योग्य ठरेल. जेवायची व्यवस्था केली आहे. तुम्ही सगळ्यांनी जेवण करून जा आणि आम्हालाही वाढा, या शब्दांत जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

दरम्यान, तुमचे पेशन्स संपलेले आहेत. तुमच्यात काही शिस्त नाही. हुल्लडबाजी जास्त आहे. तुम्ही इथे दादागिरी करायला आला आहात की कशाला आला आहात? भाषणे होत आहेत, सभा चालू आहे, तुम्ही इतक्या संख्येने इथे बसला आहात. क्षुल्लक कारणावरून गोंधळ का घालता? असे प्रश्न विचारत जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस