शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

“आता भाषण करायची इच्छा नाही, हे चालणार नाही”; जयंत पाटील संतापले, नेमके काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 11:08 IST

NCP SP Group Jayant Patil News: माझ्या भाषणाचे काही फार महत्त्व नाही. असे राजकारण असते का? किती अतिरेक? ही काय पद्धत आहे? असे सांगत जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला.

NCP SP Group Jayant Patil News: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लाडकी बहीण योजना अधिक प्रभावीपणे सरकारला राबवायची आहे, त्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या बैठका, सभा यांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते लोकसभेची पुनरावृत्ती करण्यास इच्छुक आहेत. यातच आता मला भाषण करण्याची इच्छा नाही. ही योग्य पद्धत नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवस्वराज्य यात्रेसाठी शरद पवार गटाची नेतेमंडळी राज्यात सभा घेत आहेत. यातील एका सभेत संबोधित करण्यासाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि पक्षाचे इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते. इतर नेत्यांचे भाषण सुरू असताना अचानक समोरच्या लोकांनी अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली. एका अज्ञात व्यक्तीने हातात धरलेल्या पोस्टरवरून गोंधळाला सुरुवात झाल्याचे समजते. यावरून जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. 

मला आता भाषण करायची इच्छा नाही, हे चालणार नाही

कुणीतरी कुठेतरी एक पोस्टर हातात धरले म्हणून इथे दंगा करायची काय गरज आहे? काय चालले आहे? असे राजकारण असते का? किती अतिरेक? ही काय पद्धत आहे? मला तुमच्यासमोर भाषण करण्याची इच्छा नाही. मला हे चालत नाही. ही पद्धत नाही. आता उशीर झाला आहे. माझ्या भाषणाचे काही फार महत्त्व नाही. आपण आता सभा थांबवणे योग्य ठरेल. जेवायची व्यवस्था केली आहे. तुम्ही सगळ्यांनी जेवण करून जा आणि आम्हालाही वाढा, या शब्दांत जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

दरम्यान, तुमचे पेशन्स संपलेले आहेत. तुमच्यात काही शिस्त नाही. हुल्लडबाजी जास्त आहे. तुम्ही इथे दादागिरी करायला आला आहात की कशाला आला आहात? भाषणे होत आहेत, सभा चालू आहे, तुम्ही इतक्या संख्येने इथे बसला आहात. क्षुल्लक कारणावरून गोंधळ का घालता? असे प्रश्न विचारत जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस