शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
3
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
4
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
5
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
6
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
7
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
8
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
9
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
10
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
11
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
12
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
13
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
14
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
15
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
16
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
17
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
18
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
19
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
20
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

“आता भाषण करायची इच्छा नाही, हे चालणार नाही”; जयंत पाटील संतापले, नेमके काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 11:08 IST

NCP SP Group Jayant Patil News: माझ्या भाषणाचे काही फार महत्त्व नाही. असे राजकारण असते का? किती अतिरेक? ही काय पद्धत आहे? असे सांगत जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला.

NCP SP Group Jayant Patil News: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लाडकी बहीण योजना अधिक प्रभावीपणे सरकारला राबवायची आहे, त्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या बैठका, सभा यांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते लोकसभेची पुनरावृत्ती करण्यास इच्छुक आहेत. यातच आता मला भाषण करण्याची इच्छा नाही. ही योग्य पद्धत नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवस्वराज्य यात्रेसाठी शरद पवार गटाची नेतेमंडळी राज्यात सभा घेत आहेत. यातील एका सभेत संबोधित करण्यासाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि पक्षाचे इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते. इतर नेत्यांचे भाषण सुरू असताना अचानक समोरच्या लोकांनी अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली. एका अज्ञात व्यक्तीने हातात धरलेल्या पोस्टरवरून गोंधळाला सुरुवात झाल्याचे समजते. यावरून जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. 

मला आता भाषण करायची इच्छा नाही, हे चालणार नाही

कुणीतरी कुठेतरी एक पोस्टर हातात धरले म्हणून इथे दंगा करायची काय गरज आहे? काय चालले आहे? असे राजकारण असते का? किती अतिरेक? ही काय पद्धत आहे? मला तुमच्यासमोर भाषण करण्याची इच्छा नाही. मला हे चालत नाही. ही पद्धत नाही. आता उशीर झाला आहे. माझ्या भाषणाचे काही फार महत्त्व नाही. आपण आता सभा थांबवणे योग्य ठरेल. जेवायची व्यवस्था केली आहे. तुम्ही सगळ्यांनी जेवण करून जा आणि आम्हालाही वाढा, या शब्दांत जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

दरम्यान, तुमचे पेशन्स संपलेले आहेत. तुमच्यात काही शिस्त नाही. हुल्लडबाजी जास्त आहे. तुम्ही इथे दादागिरी करायला आला आहात की कशाला आला आहात? भाषणे होत आहेत, सभा चालू आहे, तुम्ही इतक्या संख्येने इथे बसला आहात. क्षुल्लक कारणावरून गोंधळ का घालता? असे प्रश्न विचारत जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस