शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“आता भाषण करायची इच्छा नाही, हे चालणार नाही”; जयंत पाटील संतापले, नेमके काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 11:08 IST

NCP SP Group Jayant Patil News: माझ्या भाषणाचे काही फार महत्त्व नाही. असे राजकारण असते का? किती अतिरेक? ही काय पद्धत आहे? असे सांगत जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला.

NCP SP Group Jayant Patil News: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लाडकी बहीण योजना अधिक प्रभावीपणे सरकारला राबवायची आहे, त्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या बैठका, सभा यांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते लोकसभेची पुनरावृत्ती करण्यास इच्छुक आहेत. यातच आता मला भाषण करण्याची इच्छा नाही. ही योग्य पद्धत नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवस्वराज्य यात्रेसाठी शरद पवार गटाची नेतेमंडळी राज्यात सभा घेत आहेत. यातील एका सभेत संबोधित करण्यासाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि पक्षाचे इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते. इतर नेत्यांचे भाषण सुरू असताना अचानक समोरच्या लोकांनी अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली. एका अज्ञात व्यक्तीने हातात धरलेल्या पोस्टरवरून गोंधळाला सुरुवात झाल्याचे समजते. यावरून जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. 

मला आता भाषण करायची इच्छा नाही, हे चालणार नाही

कुणीतरी कुठेतरी एक पोस्टर हातात धरले म्हणून इथे दंगा करायची काय गरज आहे? काय चालले आहे? असे राजकारण असते का? किती अतिरेक? ही काय पद्धत आहे? मला तुमच्यासमोर भाषण करण्याची इच्छा नाही. मला हे चालत नाही. ही पद्धत नाही. आता उशीर झाला आहे. माझ्या भाषणाचे काही फार महत्त्व नाही. आपण आता सभा थांबवणे योग्य ठरेल. जेवायची व्यवस्था केली आहे. तुम्ही सगळ्यांनी जेवण करून जा आणि आम्हालाही वाढा, या शब्दांत जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

दरम्यान, तुमचे पेशन्स संपलेले आहेत. तुमच्यात काही शिस्त नाही. हुल्लडबाजी जास्त आहे. तुम्ही इथे दादागिरी करायला आला आहात की कशाला आला आहात? भाषणे होत आहेत, सभा चालू आहे, तुम्ही इतक्या संख्येने इथे बसला आहात. क्षुल्लक कारणावरून गोंधळ का घालता? असे प्रश्न विचारत जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस