शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

“धनंजय मुंडेंना रात्री जाऊन मनोज जरांगेंची भेट का घ्यावी लागली?”; बजरंग सोनावणेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 17:29 IST

NCP SP Group Bajrang Sonawane News: लोकसभेप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लावण्यास बीड जिल्ह्यातील जनता उत्सुक आहे, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे.

NCP SP Group Bajrang Sonawane News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात येताना दिसत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच मराठा आरक्षणाच्या विषयावरून मनोज जरांगे यांनी आमदार पाडण्याची भाषा केली आहे. यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनावणे यांनी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना थेट सवाल केला आहे. 

राज्यातील अनेक भागांना अतिवृष्टीने चांगलेच झोडपून काढले. शेतकरी बांधवांना यामुळे मोठा फटका सहन करावा लागला. मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली होती आणि तिथूनच धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली होती. धनंजय मुंडे यांनी रात्री जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. यावरून बजरंग सोनावणे यांनी काही प्रश्न उपस्थित केले.

धनंजय मुंडेंना रात्री जाऊन मनोज जरांगेंची भेट का घ्यावी लागली?

धनंजय मुंडे यांना रात्री का भेटी घ्याव्या लागत आहेत? आता त्यांनी मनोज जरांगे यांची भेट का घेतली? हे मलाही समजले नाही, अशी प्रतिक्रिया बजरंग सोनावणे यांनी दिली. तसेच राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी काम करायला पाहिजे. धनंजय मुंडे यांनी आश्वासन दिले होते की, आम्ही ‘एनडीआरएफ’चे निकष मोडून सर्व शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत सरसकट मदत करण्यात येईल. यानंतर त्याच दिवशी मी सांगितले की, धनंजय मुंडे यांनी जर सरसकट ‘एनडीआरएफ’चे सर्व निकष मोडून तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत केली, शेतकऱ्यांना अनुदान दिले तर मी त्यांचा जाहीर सत्कार करणार आहे, असे बजरंग सोनावणे म्हणाले. 

दरम्यान, बीड जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी एवढी उत्सुकता लोकांमध्ये आहे की, कधी निवडणूक जाहीर होते आणि लोकसभेचा निकाल दिला त्या पद्धतीने बीड जिल्ह्यातील विधानसभेचा निकाल आम्ही कधी देतो, अशी उत्सुकता लोकांमध्ये आहे. अद्याप परळी विधानसभा मतदारसंघाबाबत आमच्या पक्षाचा कोणता निर्णय झालेला नाही. विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी होत आहे. पक्ष योग्य उमेदवार देईल, असे सोनावणे यांनी सांगितले. 

टॅग्स :bajrang sonwaneबजरंग सोनवणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेस