शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 17:14 IST

Sharad Pawar News: इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्यासह पुढील पिढीने देशासाठी दिलेले योगदान कधी विसरता येणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar News: ज्यांच्या हाती सत्ता आहे. त्या सत्तेचा गैरवापर केला जातो. तुमच्या मूळ प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही. या देशात परिवर्तनाची गरज आहे. ती गरज तुम्ही काही प्रमाणात भागवली. लोकसभा निवडणुकीत मोदी ४०० पार सांगत होते. त्याखाली येत नव्हते. ही भाषा बोलत होते. त्यांना भारताच्या जनतेने २४० जागा दिल्या. चंद्राबाबू, नितीश कुमार या दोन मुख्यमंत्र्यांची मदत झाली नसती तर दिल्लीतील मोदींचे सरकार तयार झाले नसते. पण तरीही यातून काही शिकले पाहिजे. त्या प्रकारची भूमिका घेतली जात नाही, असे शरद पवार यांनी एका सभेत सांगितले.

मुस्लिम समाजाबद्दल भाजपा व त्यांचे नेते चुकीचे वक्तव्य करत आहेत. सत्ता त्यांच्या डोक्यात गेली आहे. आता त्यांची जागा त्याला दाखवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही. काँग्रेसवर मोदी टीका करत आहेत. काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी हिंदुस्तानसाठी दिलेले योगदान मोठे आहे. इंदिरा गांधी या सगळ्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

समुद्राच्या वाऱ्यावर सुद्धा पैसे खाल्ले जातात

त्याच्या हातात सत्ता आहे, तसा गैरवापर केला जात आहे. समुद्राच्या वाऱ्यावर सुद्धा पैसे खाल्ले जातात. माझी एक सवय आहे, मी वेळ असेल तर शक्यतो गाडीनेच प्रवास करतो. त्यामुळे आपल्याला रस्ते कसे आहेत ते कळतात. चिपळूण ते कराड या रस्त्याची दुरावस्था पहिली, तेव्हा लोकांना विचारले हे रस्ते इतके खराब कसे, तेव्हा कळले की हा रस्ते तीन वेळा दुरुस्त झाला. म्हणजेच यातून किती भ्रष्टाचार करावा लागतो हे यातून दिसते आहे, या शब्दांत शरद पवार यांनी निशाणा साधला.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान म्हणतात, गांधी कुटुंबाने देशाला लुटले. काय वाटले पाहिजे बोलायला. राजीव गांधी देशासाठी सर्व दिले. त्यांची पत्नी सोनिया गांधी त्यांच्याबद्दल आम्ही राजकीय भूमिका घेतली. पण सोनिया गांधींनी परदेशात जाण्याचा विचार केला नाही. त्यांनी देशाची बांधिलकी ठेवली. त्या आणि त्यांची पिढी देशाच्या भल्याचा विचार करतात. देशाबाबत आस्था दाखवतात. असे असताना पंतप्रधान भ्रष्टाचाराची पिढी म्हणतात. माझ्यासारख्यांना आश्चर्य वाटते. देशाचा पंतप्रधान या पद्धतीने कसे बोलू शकतात, असे सांगत शरद पवार यांनी हल्लाबोल केला. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा