शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 17:14 IST

Sharad Pawar News: इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्यासह पुढील पिढीने देशासाठी दिलेले योगदान कधी विसरता येणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar News: ज्यांच्या हाती सत्ता आहे. त्या सत्तेचा गैरवापर केला जातो. तुमच्या मूळ प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही. या देशात परिवर्तनाची गरज आहे. ती गरज तुम्ही काही प्रमाणात भागवली. लोकसभा निवडणुकीत मोदी ४०० पार सांगत होते. त्याखाली येत नव्हते. ही भाषा बोलत होते. त्यांना भारताच्या जनतेने २४० जागा दिल्या. चंद्राबाबू, नितीश कुमार या दोन मुख्यमंत्र्यांची मदत झाली नसती तर दिल्लीतील मोदींचे सरकार तयार झाले नसते. पण तरीही यातून काही शिकले पाहिजे. त्या प्रकारची भूमिका घेतली जात नाही, असे शरद पवार यांनी एका सभेत सांगितले.

मुस्लिम समाजाबद्दल भाजपा व त्यांचे नेते चुकीचे वक्तव्य करत आहेत. सत्ता त्यांच्या डोक्यात गेली आहे. आता त्यांची जागा त्याला दाखवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही. काँग्रेसवर मोदी टीका करत आहेत. काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी हिंदुस्तानसाठी दिलेले योगदान मोठे आहे. इंदिरा गांधी या सगळ्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

समुद्राच्या वाऱ्यावर सुद्धा पैसे खाल्ले जातात

त्याच्या हातात सत्ता आहे, तसा गैरवापर केला जात आहे. समुद्राच्या वाऱ्यावर सुद्धा पैसे खाल्ले जातात. माझी एक सवय आहे, मी वेळ असेल तर शक्यतो गाडीनेच प्रवास करतो. त्यामुळे आपल्याला रस्ते कसे आहेत ते कळतात. चिपळूण ते कराड या रस्त्याची दुरावस्था पहिली, तेव्हा लोकांना विचारले हे रस्ते इतके खराब कसे, तेव्हा कळले की हा रस्ते तीन वेळा दुरुस्त झाला. म्हणजेच यातून किती भ्रष्टाचार करावा लागतो हे यातून दिसते आहे, या शब्दांत शरद पवार यांनी निशाणा साधला.

दरम्यान, देशाचे पंतप्रधान म्हणतात, गांधी कुटुंबाने देशाला लुटले. काय वाटले पाहिजे बोलायला. राजीव गांधी देशासाठी सर्व दिले. त्यांची पत्नी सोनिया गांधी त्यांच्याबद्दल आम्ही राजकीय भूमिका घेतली. पण सोनिया गांधींनी परदेशात जाण्याचा विचार केला नाही. त्यांनी देशाची बांधिलकी ठेवली. त्या आणि त्यांची पिढी देशाच्या भल्याचा विचार करतात. देशाबाबत आस्था दाखवतात. असे असताना पंतप्रधान भ्रष्टाचाराची पिढी म्हणतात. माझ्यासारख्यांना आश्चर्य वाटते. देशाचा पंतप्रधान या पद्धतीने कसे बोलू शकतात, असे सांगत शरद पवार यांनी हल्लाबोल केला. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा