शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू अभिमानाने नव्हे; शरमेने मांडत होतो! - अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 15:27 IST

राज्यात भाजप-शिवसेनेची यात्रा सुरु असताना राष्ट्रवादीने आजपासून शिवस्वराज्य यात्रा सुरु केली आहे.

मुंबई - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद आणि भाजपच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावरून शिवस्वराज्य यात्रेचे प्रारंभ करण्यात आहे. यावेळी, अभिनेते व राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहे. लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडत असताना अभिमानाने नव्हे तर लाजेने आणि शरमेने बोलावे लागत होते, असे कोल्हे म्हणाले.

राज्यात भाजप-शिवसेनेची यात्रा सुरु असताना राष्ट्रवादीने आजपासून शिवस्वराज्य यात्रा सुरु केली आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन अमोल कोल्हे आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या यात्रेला सुरवात केली. यावेळी आपल्या भाषणातून कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली. लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडत असताना मी अभिमानाने किंवा आनंदाने बोलत नव्हतो, तर लाजेने आणि शरमेने बोलत होतो. अशा शब्दात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

ज्या शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचा भाजीच्या देठाला हात लावू नका असे सांगितले होते. त्याच महाराजांच्या महाराष्ट्रात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहे, हे दारूण वास्तव लोकसभेत सांगाव लागत होते. आणि हे सांगत असताना विचाराव वाटते, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. अशा शब्दात त्यांनी सरकारचा समाचार घेतला.