शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू अभिमानाने नव्हे; शरमेने मांडत होतो! - अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 15:27 IST

राज्यात भाजप-शिवसेनेची यात्रा सुरु असताना राष्ट्रवादीने आजपासून शिवस्वराज्य यात्रा सुरु केली आहे.

मुंबई - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद आणि भाजपच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावरून शिवस्वराज्य यात्रेचे प्रारंभ करण्यात आहे. यावेळी, अभिनेते व राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहे. लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडत असताना अभिमानाने नव्हे तर लाजेने आणि शरमेने बोलावे लागत होते, असे कोल्हे म्हणाले.

राज्यात भाजप-शिवसेनेची यात्रा सुरु असताना राष्ट्रवादीने आजपासून शिवस्वराज्य यात्रा सुरु केली आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन अमोल कोल्हे आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या यात्रेला सुरवात केली. यावेळी आपल्या भाषणातून कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली. लोकसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडत असताना मी अभिमानाने किंवा आनंदाने बोलत नव्हतो, तर लाजेने आणि शरमेने बोलत होतो. अशा शब्दात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

ज्या शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचा भाजीच्या देठाला हात लावू नका असे सांगितले होते. त्याच महाराजांच्या महाराष्ट्रात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहे, हे दारूण वास्तव लोकसभेत सांगाव लागत होते. आणि हे सांगत असताना विचाराव वाटते, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. अशा शब्दात त्यांनी सरकारचा समाचार घेतला.