शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

“वडिलांचे प्रामाणिकपणे काम, मुलात ५ टक्केही निष्ठा नाही”; शरद पवारांची वळसे पाटलांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 22:20 IST

NCP Sharad Pawar News: एका जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवारांनी भाजपा, केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी यांच्यासह अशोक चव्हाण आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

NCP Sharad Pawar News: शिवसेना ठाकरे गटाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गट राज्यसभात सभा घेताना दिसत आहे. “महासभा एकजुटीची, साथ  अनुभवाची ताकद महाराष्ट्राची” या सभेतून शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. एक  वेगळा काळ आहे. देशामध्ये वेगळे चित्र आहे. शेतीची इमान राखणारा शेतकरी वर्ग अस्वस्थ आणि  संकटात आहे. पिकाची किंमत शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही. खर्च अधिक लाभ, उत्पन्न कमी ही स्थिती  झाली तर कर्जबाजारी होतो. कर्ज डोक्यावर एवढे बसते की,  घरातली भांडी-कुंडीही काढण्याची भूमिका सावकार किंवा बँका येऊन सुद्धा  घेतात. ही स्थिती पाहिल्यानंतर सन्मानाने जगायची इच्छा ज्या शेतकऱ्याची आहे  तो कधीकधी आत्महत्या करायला जातो. हे चित्र आज देशामध्ये आहे, या शब्दांत शरद पवार यांनी टीका केली.

टेलिव्हिजन असो किंवा वर्तमानपत्र असो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रोज एक जाहिरात असते की, मी तुम्हाला गॅरंटी देतो. मोदीची  गॅरंटी, कसली? तर तुम्हाला शेतमालाची किंमत चांगली मिळेल. तुमच्या  मुलांना नोकरी मिळेल. तुमचा माल जगाच्या बाजार समितीत जाईल. त्याची किंमत  चांगलीच तुम्हाला मिळेल. ही गॅरंटी मोदी देतात. एका बाजूला यांची गॅरेंटी  आणि दुसऱ्या बाजूने दर दिवसाला कोणी ना कोणीतरी आत्महत्या करत आहे. हे  चित्र या देशामध्ये पाहायला मिळत आहे आणि म्हणून ही स्थिती किती दिवस चालू  द्यायची? यात बदल करायचा की नाही? जर ठरवले तर आपण करू शकतो, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

मोदी यांना पक्ष फोडणे, विरोधकांना तुरुंगात टाकणे यातच आस्था

तुम्ही लोकांनी मला देशामध्ये शेतीची जबाबदारी १० वर्षांसाठी  दिली. १० वर्षानंतर, ज्यावेळी  शेती खात्याचे काम माझे संपले आणि त्या खात्यातून बाहेर आलो, त्याचवेळी  हा देश जगातील २ नंबरचा गहू तयार करणारा देश झाला. १ नंबरचा तांदूळ तयार  करणारा देश झाला. आता या सर्वाची गरज आहे. पण, मोदी साहेबांना यासंबंधीची  आस्था नाही. त्यांना आस्था कशात आहे तर, पक्ष फोडणे, विरोधकांना तुरुंगात  टाकणे, या शब्दांत शरद पवार यांनी निशाणा साधला. तसेच पंतप्रधान कुठे-कुठे काय-काय बोलतात. महाराष्ट्राचे एकेकाळी  मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण, त्यांच्याबद्दल पंतप्रधान यांनी  कुठेतरी जाहीर भाष्य केले. परिणाम काय झाला तर, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी अशोक  चव्हाण गेले. ज्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले ते विसरून ते  भाजपात जाऊन बसले. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या दमदाटीने तसेच पक्ष  फोडणे, माणसे फोडणे, ते जर आपल्या पक्षात आले नाही, तर दमदाटी करून  त्यांच्यावर बेकायदेशीररित्या कारवाई केली जात आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली. 

दरम्यान, अनेक लोकांनी माझ्याबरोबर प्रामाणिकपणाने काम केले. माझ्याबरोबर काम करणारे दत्तात्रय वळसे पाटील होते. या लोकांचे वैशिष्ट्य असे होते की, निष्ठा होती त्यांच्याकडे; निष्ठेवर त्यांनी कायम  काम केले. आम्हाला  साथ दिली आणि आज काय बघतोय आम्ही? ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. दत्तू पाटलांचा वारसा आहे. त्यांनी काय केले? त्यांना आम्ही काय कमी दिले? विधानसभा दिली. अनेक मंत्रिपद दिले. विधानसभेचे अध्यक्षपद दिले. देशाच्या साखर उद्योगांचे सबंध हिंदुस्तानचे पद दिले. अशा अनेक गोष्टी दिल्या. प्रतिष्ठा दिली आणि हे दिल्यानंतर सुद्धा दत्तू पाटलांमध्ये जी निष्ठा  होती, त्याच्या ५ टक्के सुद्धा त्यांच्यात नाही. आज निघून जाण्यासंबंधी भूमिका या नेतृत्वाने घेतली. जे निष्ठेने आम्हा लोकांच्या निष्ठेला  साथ देत नसतील, ते सत्तेमध्ये निवडून देणाऱ्या नागरिकांची निष्ठा ठेवणार नाहीत. ही भूमिका आपल्या सर्वांना लक्षात ठेवावी लागेल आणि हे चित्र  बदलायचे असेल, तर आपल्याला जागे व्हावे लागेल, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार