शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

“वडिलांचे प्रामाणिकपणे काम, मुलात ५ टक्केही निष्ठा नाही”; शरद पवारांची वळसे पाटलांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 22:20 IST

NCP Sharad Pawar News: एका जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवारांनी भाजपा, केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी यांच्यासह अशोक चव्हाण आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

NCP Sharad Pawar News: शिवसेना ठाकरे गटाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गट राज्यसभात सभा घेताना दिसत आहे. “महासभा एकजुटीची, साथ  अनुभवाची ताकद महाराष्ट्राची” या सभेतून शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. एक  वेगळा काळ आहे. देशामध्ये वेगळे चित्र आहे. शेतीची इमान राखणारा शेतकरी वर्ग अस्वस्थ आणि  संकटात आहे. पिकाची किंमत शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही. खर्च अधिक लाभ, उत्पन्न कमी ही स्थिती  झाली तर कर्जबाजारी होतो. कर्ज डोक्यावर एवढे बसते की,  घरातली भांडी-कुंडीही काढण्याची भूमिका सावकार किंवा बँका येऊन सुद्धा  घेतात. ही स्थिती पाहिल्यानंतर सन्मानाने जगायची इच्छा ज्या शेतकऱ्याची आहे  तो कधीकधी आत्महत्या करायला जातो. हे चित्र आज देशामध्ये आहे, या शब्दांत शरद पवार यांनी टीका केली.

टेलिव्हिजन असो किंवा वर्तमानपत्र असो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रोज एक जाहिरात असते की, मी तुम्हाला गॅरंटी देतो. मोदीची  गॅरंटी, कसली? तर तुम्हाला शेतमालाची किंमत चांगली मिळेल. तुमच्या  मुलांना नोकरी मिळेल. तुमचा माल जगाच्या बाजार समितीत जाईल. त्याची किंमत  चांगलीच तुम्हाला मिळेल. ही गॅरंटी मोदी देतात. एका बाजूला यांची गॅरेंटी  आणि दुसऱ्या बाजूने दर दिवसाला कोणी ना कोणीतरी आत्महत्या करत आहे. हे  चित्र या देशामध्ये पाहायला मिळत आहे आणि म्हणून ही स्थिती किती दिवस चालू  द्यायची? यात बदल करायचा की नाही? जर ठरवले तर आपण करू शकतो, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

मोदी यांना पक्ष फोडणे, विरोधकांना तुरुंगात टाकणे यातच आस्था

तुम्ही लोकांनी मला देशामध्ये शेतीची जबाबदारी १० वर्षांसाठी  दिली. १० वर्षानंतर, ज्यावेळी  शेती खात्याचे काम माझे संपले आणि त्या खात्यातून बाहेर आलो, त्याचवेळी  हा देश जगातील २ नंबरचा गहू तयार करणारा देश झाला. १ नंबरचा तांदूळ तयार  करणारा देश झाला. आता या सर्वाची गरज आहे. पण, मोदी साहेबांना यासंबंधीची  आस्था नाही. त्यांना आस्था कशात आहे तर, पक्ष फोडणे, विरोधकांना तुरुंगात  टाकणे, या शब्दांत शरद पवार यांनी निशाणा साधला. तसेच पंतप्रधान कुठे-कुठे काय-काय बोलतात. महाराष्ट्राचे एकेकाळी  मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण, त्यांच्याबद्दल पंतप्रधान यांनी  कुठेतरी जाहीर भाष्य केले. परिणाम काय झाला तर, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी अशोक  चव्हाण गेले. ज्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले ते विसरून ते  भाजपात जाऊन बसले. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या दमदाटीने तसेच पक्ष  फोडणे, माणसे फोडणे, ते जर आपल्या पक्षात आले नाही, तर दमदाटी करून  त्यांच्यावर बेकायदेशीररित्या कारवाई केली जात आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली. 

दरम्यान, अनेक लोकांनी माझ्याबरोबर प्रामाणिकपणाने काम केले. माझ्याबरोबर काम करणारे दत्तात्रय वळसे पाटील होते. या लोकांचे वैशिष्ट्य असे होते की, निष्ठा होती त्यांच्याकडे; निष्ठेवर त्यांनी कायम  काम केले. आम्हाला  साथ दिली आणि आज काय बघतोय आम्ही? ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. दत्तू पाटलांचा वारसा आहे. त्यांनी काय केले? त्यांना आम्ही काय कमी दिले? विधानसभा दिली. अनेक मंत्रिपद दिले. विधानसभेचे अध्यक्षपद दिले. देशाच्या साखर उद्योगांचे सबंध हिंदुस्तानचे पद दिले. अशा अनेक गोष्टी दिल्या. प्रतिष्ठा दिली आणि हे दिल्यानंतर सुद्धा दत्तू पाटलांमध्ये जी निष्ठा  होती, त्याच्या ५ टक्के सुद्धा त्यांच्यात नाही. आज निघून जाण्यासंबंधी भूमिका या नेतृत्वाने घेतली. जे निष्ठेने आम्हा लोकांच्या निष्ठेला  साथ देत नसतील, ते सत्तेमध्ये निवडून देणाऱ्या नागरिकांची निष्ठा ठेवणार नाहीत. ही भूमिका आपल्या सर्वांना लक्षात ठेवावी लागेल आणि हे चित्र  बदलायचे असेल, तर आपल्याला जागे व्हावे लागेल, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार