शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

“वडिलांचे प्रामाणिकपणे काम, मुलात ५ टक्केही निष्ठा नाही”; शरद पवारांची वळसे पाटलांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 22:20 IST

NCP Sharad Pawar News: एका जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवारांनी भाजपा, केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी यांच्यासह अशोक चव्हाण आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

NCP Sharad Pawar News: शिवसेना ठाकरे गटाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गट राज्यसभात सभा घेताना दिसत आहे. “महासभा एकजुटीची, साथ  अनुभवाची ताकद महाराष्ट्राची” या सभेतून शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. एक  वेगळा काळ आहे. देशामध्ये वेगळे चित्र आहे. शेतीची इमान राखणारा शेतकरी वर्ग अस्वस्थ आणि  संकटात आहे. पिकाची किंमत शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही. खर्च अधिक लाभ, उत्पन्न कमी ही स्थिती  झाली तर कर्जबाजारी होतो. कर्ज डोक्यावर एवढे बसते की,  घरातली भांडी-कुंडीही काढण्याची भूमिका सावकार किंवा बँका येऊन सुद्धा  घेतात. ही स्थिती पाहिल्यानंतर सन्मानाने जगायची इच्छा ज्या शेतकऱ्याची आहे  तो कधीकधी आत्महत्या करायला जातो. हे चित्र आज देशामध्ये आहे, या शब्दांत शरद पवार यांनी टीका केली.

टेलिव्हिजन असो किंवा वर्तमानपत्र असो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रोज एक जाहिरात असते की, मी तुम्हाला गॅरंटी देतो. मोदीची  गॅरंटी, कसली? तर तुम्हाला शेतमालाची किंमत चांगली मिळेल. तुमच्या  मुलांना नोकरी मिळेल. तुमचा माल जगाच्या बाजार समितीत जाईल. त्याची किंमत  चांगलीच तुम्हाला मिळेल. ही गॅरंटी मोदी देतात. एका बाजूला यांची गॅरेंटी  आणि दुसऱ्या बाजूने दर दिवसाला कोणी ना कोणीतरी आत्महत्या करत आहे. हे  चित्र या देशामध्ये पाहायला मिळत आहे आणि म्हणून ही स्थिती किती दिवस चालू  द्यायची? यात बदल करायचा की नाही? जर ठरवले तर आपण करू शकतो, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

मोदी यांना पक्ष फोडणे, विरोधकांना तुरुंगात टाकणे यातच आस्था

तुम्ही लोकांनी मला देशामध्ये शेतीची जबाबदारी १० वर्षांसाठी  दिली. १० वर्षानंतर, ज्यावेळी  शेती खात्याचे काम माझे संपले आणि त्या खात्यातून बाहेर आलो, त्याचवेळी  हा देश जगातील २ नंबरचा गहू तयार करणारा देश झाला. १ नंबरचा तांदूळ तयार  करणारा देश झाला. आता या सर्वाची गरज आहे. पण, मोदी साहेबांना यासंबंधीची  आस्था नाही. त्यांना आस्था कशात आहे तर, पक्ष फोडणे, विरोधकांना तुरुंगात  टाकणे, या शब्दांत शरद पवार यांनी निशाणा साधला. तसेच पंतप्रधान कुठे-कुठे काय-काय बोलतात. महाराष्ट्राचे एकेकाळी  मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण, त्यांच्याबद्दल पंतप्रधान यांनी  कुठेतरी जाहीर भाष्य केले. परिणाम काय झाला तर, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी अशोक  चव्हाण गेले. ज्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले ते विसरून ते  भाजपात जाऊन बसले. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या दमदाटीने तसेच पक्ष  फोडणे, माणसे फोडणे, ते जर आपल्या पक्षात आले नाही, तर दमदाटी करून  त्यांच्यावर बेकायदेशीररित्या कारवाई केली जात आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली. 

दरम्यान, अनेक लोकांनी माझ्याबरोबर प्रामाणिकपणाने काम केले. माझ्याबरोबर काम करणारे दत्तात्रय वळसे पाटील होते. या लोकांचे वैशिष्ट्य असे होते की, निष्ठा होती त्यांच्याकडे; निष्ठेवर त्यांनी कायम  काम केले. आम्हाला  साथ दिली आणि आज काय बघतोय आम्ही? ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. दत्तू पाटलांचा वारसा आहे. त्यांनी काय केले? त्यांना आम्ही काय कमी दिले? विधानसभा दिली. अनेक मंत्रिपद दिले. विधानसभेचे अध्यक्षपद दिले. देशाच्या साखर उद्योगांचे सबंध हिंदुस्तानचे पद दिले. अशा अनेक गोष्टी दिल्या. प्रतिष्ठा दिली आणि हे दिल्यानंतर सुद्धा दत्तू पाटलांमध्ये जी निष्ठा  होती, त्याच्या ५ टक्के सुद्धा त्यांच्यात नाही. आज निघून जाण्यासंबंधी भूमिका या नेतृत्वाने घेतली. जे निष्ठेने आम्हा लोकांच्या निष्ठेला  साथ देत नसतील, ते सत्तेमध्ये निवडून देणाऱ्या नागरिकांची निष्ठा ठेवणार नाहीत. ही भूमिका आपल्या सर्वांना लक्षात ठेवावी लागेल आणि हे चित्र  बदलायचे असेल, तर आपल्याला जागे व्हावे लागेल, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार