शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

PM मोदींचे विधान, शरद पवारांकडून समाचार; म्हणाले, “माझे बोट धरुन राजकारणात आले असते तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 10:30 IST

NCP Sharad Pawar News: वसूल करायचे १०० रुपये, त्यातील ६ रुपये परत द्यायचे आणि सांगायचे की, तुमच्या खिशात मी पैसे टाकले. माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे. ही मोदी गॅरंटी कशी? असा सवाल शरद पवारांनी केला आहे.

NCP Sharad Pawar News: ही निवडणूक अत्यंत  महत्त्वाची निवडणूक आहे. काही  लोकांनी वेगळी भूमिका घेतली. लोकशाहीमध्ये कुणालाही भूमिका घ्यायचा अधिकार  आहे. पण एक अट आहे. मी तुम्हाला मत मागितले, तुम्ही मला मत दिले, तुम्ही  मला निवडून दिले आणि निवडून दिल्यानंतर मी जे मत ज्या नावाने, ज्या  पक्षाने, ज्या कार्यक्रमाने तुमच्याकडे मागितले, ते नाव, पक्ष, सगळे तुम्ही  विसरलात. मग तुम्ही लोकांची फसवणूक करता. ही फसवणूक होता कामा नये.  राजकारणामध्ये लोकांना दिलेला शब्द हा पाळला पाहिजे. लोकांचे भवितव्य हे  पाळले पाहिजे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार गटाला अप्रत्यक्षरित्या जोरदार टोला लगावला.

बारामती येथील एका मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी ईडी कारवाईवरूनही केंद्र सरकारवर निशाणा साधला. आज सत्ता ही हुकूमशाहीच्या रस्त्याला आपण जातो, त्या पद्धतीने वापरली जाते.  तुम्हाला झारखंड नावाचे राज्य माहिती आहे का? आदिवासींचे राज्य आहे. मोदींविरुद्ध भूमिका घेतली. तिथल्या मुख्यमंत्र्याला  तुरुंगात टाकले. राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे. दिल्ली देशाची  राजधानी आहे. केजरीवाल नावाचा सामान्य कुटुंबातला तरूण मुख्यमंत्री झाला.  त्यांची शैक्षणिक संस्था, आरोग्य केंद्र ही कशी चालवतात हे बघायला देशातून व  बाहेरून लोक यायला लागले. चांगले राजकारणी आज तुरुंगात आहेत. कशासाठी, असे सवाल करत शरद पवार यांनी टीका केली.

शरद पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो

दुर्दैवाने देशामध्ये जे काही घडते आहे, ते वेगळे आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. बारामतीला आले होते, तिथे भाषण केले, तेव्हा म्हणाले होते की, शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो. मात्र, पण आज त्यांचे जे काही राजकारण सुरू आहे. ते माझ्या विचारांनी नाही. माझे बोट धरल्यावर मी असले काम करू देणार नाही. मोदी सरकारने आखलेली धोरणे हिताची नाहीत. पंतप्रधान काय म्हणतात? पंतप्रधान कर बसवतात, वसूल करतात. त्या वसुलीतून १०० रुपये आले तर त्यातले ६ रुपये खिशात टाकतात आणि सांगतात की, तुमच्या खिशात मी पैसे टाकले. माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे. ही गॅरंटी  कशी? वसूल करायचे १०० आणि ६ परत द्यायचे. १०० वसूल करायची गॅरंटी हे आजचे पंतप्रधान म्हणतात. ही सामान्य माणसाच्या दृष्टीने योग्य गोष्ट नाही. हा  जो राज्य चालवण्याचा प्रकार आहे तो देशाच्या हिताचा नाही. जिथे हित नाही,  तिथे बदल पाहिजे. बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे, असे शरद पवार म्हणाले.

गेले ते गेले! आपण नवीन उभे करू

निवडणूकीत बटण दाबले पाहिजे. आता यावेळेची खूण ही वेगळी आहे.  घड्याळ्याची खूण ही तुम्हाला पाठ होती. पक्ष, घड्याळ, झेंडा  सगळ्याचीच चोरी झाली. बाकी किरकोळ काही नाही, होलसेल चोरी झाली. सगळेच्या  सगळे सोडून गेले. आता सगळ्या देशाला माहीत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  कुणी स्थापन केला? हा पक्ष आपण स्थापन केला. जे घेऊन गेले, त्यांनी मागच्या  निवडणुकीमध्ये मते मागितली. ती कुणाच्या नावाने मागितली? राष्ट्रवादीच्या  नावाने, नेत्याच्या नावाने. झेंडा कोणता होता? तोच घड्याळाचा होता.  त्यामुळे हे सगळे घेऊन मंडळी गेली. त्यामुळे काही लोक नाराज झाले. मी  म्हटले नाराज व्हायचे नाही. गेले ते गेले! आपण नवीन उभे करू. हा अधिकार  लोकांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे. नवीन पक्ष  काढू. काही नसताना पक्ष काढला, तर पक्ष नुसता काढला नाही तर राज्य  हातामध्ये घेतले. अनेकांना मंत्री केले, अनेकांना आमदार केले, अनेकांना  खासदार केले, अनेकांना केंद्राच्या मंत्रीमंडळात घेतले. नवनवीन धोरणे  घेतली, असे शरद पवारांनी सांगितले.

दरम्यान, एका दिवशी आपल्या घरात चोरी होते, म्हणून आपण घर चालवणे बंद  करतो का? पुन्हा एकदा उभे राहू, त्याच पध्दतीने आम्ही आज हा निकाल घेऊन नवा  पक्ष, नवी खूण, नवा झेंडा, कार्यक्रम जुना हा घेऊन पुढे आलेलो आहोत.  नेहमीची खूण आहे ती आता गेली, आता तुतारी आली. शिवछत्रपती ज्यावेळेला  संघर्षाने जातात त्यावेळेला सन्मानाने लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतात. पण विजय संपादन करून ज्यावेळेला शिवछत्रपती परत येतात त्यावेळेला दाराशी याच  तुतारीने त्यांचे स्वागत होते. आज महाराष्ट्रात झालेल्या बदलातून  महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या जीवनाच्या परिवर्तनाची तुतारी वाजवायची  आहे. त्यासाठी ही खूण लक्षात ठेवली पाहिजे. आणि हे काम तुम्ही लोकांनी  करावे, असे आवाहन शरद पवारांनी केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेस