शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Rohit Pawar : "कुणाकुणाचा आवाज दाबणार?, इतका कपटीपणा..."; तेजस्विनीवरून रोहित पवार आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 10:59 IST

NCP Rohit Pawar And Tejaswini Pandit : तेजस्विनीच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक काढून टाकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आक्रमक झाले आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलमाफीबाबत माध्यमांसमोर केलेलं विधान आणि प्रत्यक्षात मोठी विसंगती दिसून आली आहे. मनसेने पुन्हा एकदा टोलमाफीचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. याच दरम्यान टोलमाफीच्या या मुद्दयावर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने थेट भूमिका घेतल्याचं दिसून आलं. मात्र, तिने भूमिका घेतल्यानंतर तिच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक काढून टाकण्यात आल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. 

तेजस्विनीच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक काढून टाकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आक्रमक झाले आहेत. "हे अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण आहे. अशाप्रकारे कुणाकुणाचा आवाज दाबणार? इतका कपटीपणा योग्य नाही" असं म्हणत सरकारवर हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "सत्तेचा गैरवापर करून आपण हा मुलभूत अधिकारही हिरावून घेणार का?" असा संतप्त सवाल ही रोहित पवार यांनी विचारला आहे. 

"विरोधात व्हिडीओ टाकला म्हणून ट्रोल गँग वापरून ट्रोल करायचं, ट्विटरची ब्लू टिक काढायची, हे अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण आहे. अशाप्रकारे कुणाकुणाचा आवाज दाबणार? इतका कपटीपणा योग्य नाही. प्रत्येकाला विचारधारेचं, आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मुलभूत अधिकारही आहे, परंतु  सत्तेचा गैरवापर करून आपण हा मुलभूत अधिकारही हिरावून घेणार का?" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच TejswiniPandit हा हॅशटॅग देखील वापरला आहे. 

तेजस्विनी पंडितने यानंतर कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही, असं म्हणत सरकारला लक्ष्य केलं आहे. "माझ्या X (ट्विटर अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं. कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची' इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून? X (ट्विटर ) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात, त्याबद्दल धन्यवाद. पण बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही."

"सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र 'X' फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा ‘जय हिंद जय महाराष्ट्र’साठीचा घोष योग्यवेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत! जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदूमणारच आहे! जय हिंद जय महाराष्ट्र!" असं तेजस्विनी पंडितने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारTejaswini Punditतेजस्विनी पंडितtollplazaटोलनाका