शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

Maha Vikas Aghadi: “गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच...”; भाजपविरोधात लढण्यासाठी पवारांनी सांगितला ‘हा’ मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 12:31 IST

Maha Vikas Aghadi: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर ३ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आक्रमक पवित्रा घेत, मंत्रालयाजवळ महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात निदर्शने केली. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात आले असले तरी यापुढे आक्रमक आंदोलन करण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळत आहेत. यातच आता महात्मा गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच आक्रमक मार्गानेही लढावे लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले आहे. 

रोहित पवार यांनी काही ट्विट्स कर महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईसंदर्भात रोखठोक मत मांडले आहे. तसेच महात्मा गांधींच्या सत्याच्या मार्गासोबतच भगतसिंग, राजगुरू यांच्यासारखी आक्रमकताही दाखवावी लागेल, असे म्हटले आहे. यावेळी रोहित पवार यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या आंदोलनाचे फोटो शेअर केले आहेत. तसेच मायावती यांच्या ट्विटचा एक फोटोही दिला आहे. 

२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत हेच भूत

बिहारच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी पेटवण्यात आलेलं अभिनेत्याचं आत्महत्या प्रकरण निवडणूक संपताच शांत झालं, कदाचित २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत हेच भूत पुन्हा उकरून काढण्यात येईल आणि जाहीरनाम्यातही असू शकेल. परंतु हे राजकारण दरवेळी मूळ मुद्द्यांना बाजूला सारू शकणार नाही, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न

उत्तर प्रदेश निवडणुकीत ध्रुवीकरणाचे कोणतेच प्रयत्न यशस्वी होत नसल्याने होणारी पिछेहाट स्पष्ट दिसतेय. परिणामी महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने दबावतंत्राचे राजकारण करून उत्तर प्रदेशातील उर्वरित टप्प्यांसाठी व आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असावा. आरोप करून रान उठवायचे, बदनामी करून नेरेटिव्ह सेट करायचे, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून संविधानाने दिलेला आवाज उठवण्याचा हक्क चिरडायचा, असे प्रयत्न कपटी शत्रू करत असेल तर त्याविरोधात गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच भगतसिंग, राजगुरूंच्या आक्रमकतेच्या मार्गानेही लढावे लागेल, असे रोहित पवार यांनी आपल्या पुढील दोन ट्विट्समध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, अडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लाँड्रिंगशी संबधित प्रकरणात ईडीने मलिक यांना अटक केली आहे. ही कारवाई राजकीय हेतूने केल्याचा आरोप करून महाविकास आघाडीचे नेते एकवटले आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू असून, त्यांच्या बचावासाठी पुढे आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली जात आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीRohit Pawarरोहित पवारnawab malikनवाब मलिकCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाPoliticsराजकारण