शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maha Vikas Aghadi: “गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच...”; भाजपविरोधात लढण्यासाठी पवारांनी सांगितला ‘हा’ मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 12:31 IST

Maha Vikas Aghadi: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर ३ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आक्रमक पवित्रा घेत, मंत्रालयाजवळ महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात निदर्शने केली. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात आले असले तरी यापुढे आक्रमक आंदोलन करण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळत आहेत. यातच आता महात्मा गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच आक्रमक मार्गानेही लढावे लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले आहे. 

रोहित पवार यांनी काही ट्विट्स कर महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईसंदर्भात रोखठोक मत मांडले आहे. तसेच महात्मा गांधींच्या सत्याच्या मार्गासोबतच भगतसिंग, राजगुरू यांच्यासारखी आक्रमकताही दाखवावी लागेल, असे म्हटले आहे. यावेळी रोहित पवार यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या आंदोलनाचे फोटो शेअर केले आहेत. तसेच मायावती यांच्या ट्विटचा एक फोटोही दिला आहे. 

२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत हेच भूत

बिहारच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी पेटवण्यात आलेलं अभिनेत्याचं आत्महत्या प्रकरण निवडणूक संपताच शांत झालं, कदाचित २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत हेच भूत पुन्हा उकरून काढण्यात येईल आणि जाहीरनाम्यातही असू शकेल. परंतु हे राजकारण दरवेळी मूळ मुद्द्यांना बाजूला सारू शकणार नाही, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न

उत्तर प्रदेश निवडणुकीत ध्रुवीकरणाचे कोणतेच प्रयत्न यशस्वी होत नसल्याने होणारी पिछेहाट स्पष्ट दिसतेय. परिणामी महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने दबावतंत्राचे राजकारण करून उत्तर प्रदेशातील उर्वरित टप्प्यांसाठी व आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असावा. आरोप करून रान उठवायचे, बदनामी करून नेरेटिव्ह सेट करायचे, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून संविधानाने दिलेला आवाज उठवण्याचा हक्क चिरडायचा, असे प्रयत्न कपटी शत्रू करत असेल तर त्याविरोधात गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच भगतसिंग, राजगुरूंच्या आक्रमकतेच्या मार्गानेही लढावे लागेल, असे रोहित पवार यांनी आपल्या पुढील दोन ट्विट्समध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, अडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लाँड्रिंगशी संबधित प्रकरणात ईडीने मलिक यांना अटक केली आहे. ही कारवाई राजकीय हेतूने केल्याचा आरोप करून महाविकास आघाडीचे नेते एकवटले आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू असून, त्यांच्या बचावासाठी पुढे आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली जात आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीRohit Pawarरोहित पवारnawab malikनवाब मलिकCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाPoliticsराजकारण