शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा”; प्रफुल्ल पटेलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 15:07 IST

Praful Patel: महायुतीमध्ये चांगला समन्वय आहे. उगाच कुणी वादावादीचा लावायचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचे आहे, त्यात तथ्य नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे.

Praful Patel: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यावर सत्तेत सहभागी झालेला अजित पवार गट यांच्यात मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा बैठका अजित पवार घेत असल्याचे समोर आले होते. यावरूनही शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात मतभेद असल्याचे बोलले जात होते. तसेच अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असे दावेही केले जात आहेत. मात्र, यातच अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

येत्या १५ ते २० दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होतात ते जनता बघेल. यात मुख्य खुर्चीपासून बदलाला सुरुवात होणार आहे. पुढचा सप्टेंबर हा महिना या राज्यातल्या सत्ताबदलाचा असेल. माझ्या सूत्रांनी मला माहिती दिली आहे. राज्यातील सत्तेत बदल होईल. एकूणच ज्या पद्धतीने हे सरकार चालले आहे त्यावरून सर्वगोष्टी स्पष्ट आहेत. ज्यांना मुख्यमंत्री केले आहे, त्यांना काम करु दिले जात नाही आणि जे मुख्यमंत्री होणार होते ते अर्धे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर त्यांच्या अर्ध्यातला अर्धा हिस्सा काढून घेतला. त्यामुळे १०५ आमदार असूनही सत्तेतला पाव हिस्सा मिळणार असेल तर ही मंडळी काय स्वस्थ बसणारी आहे का? माझ्या सूत्रांनी १०० टक्के सांगितले आहे की राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे जोरात सुरू आहेत, असा मोठा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर प्रफुल्ल पटेल यांनी खोचक शब्दांत टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा. वडेट्टीवार यांची प्रगती झाली आहे. सप्टेंबरमध्ये सरकार पडणार आहे असे ते म्हणत असतील तर त्यावर मला पाणी फेरायचे नाही, सगळ्यांना शुभेच्छा, असे सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेचा प्रफुल्ल पटेल यांनी समाचार घेतला.

दरम्यान, अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक विभागाची माहिती घेण्याचा, बैठक घेण्याचा आणि योग्य रीतीने निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यात काहीही चूक नाही. आमच्या महायुतीमध्ये तिन्ही घटक पक्षात चांगला समन्वय आहे. प्रत्येक गोष्टीत एकमेकांशी संवाद साधून आम्ही निर्णय घेत असतो. यात कोणी उगाच वादावादी लावायचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे, त्यात तथ्य नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलprafull patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेस