शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

भाजप, शिवसेनेच्या खेळीने राष्ट्रवादीच्या सरदारांची पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 05:07 IST

मोहिते, क्षीरसागर, पिचडांनंतर आता पद्मसिंह पाटलांचा नंबर

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपापल्या भागात प्रभाव असलेल्या नेत्यांचा (सरदारांचा) एकत्रित पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अशी या पक्षाची व्याख्या केली जाते, मग आता या सरदारांनाच आपल्याकडे ओढले तर आपोआपच या पक्षाला घरघर लागेल अशी रणनीती भाजप व शिवसेनेने आखली असून त्यानुसार एकेका सरदारांना आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा दोघांमध्ये सुरू आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आमचे कमीत कमी ५० आमदार नक्कीच निवडून येतील, असे छातीठोकपणे सांगत होते. ३५ नेते असे आहेत की जे त्या-त्या भागात अत्यंत प्रभावी आहेत आणि ते पराभूत होण्याचा प्रश्नच नाही, उर्वरित १५ जागा जिंकणे आमच्यासाठी कठीण नाही, असा तर्क त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते मांडत होते. ५० तर नाही पण राष्ट्रवादीने ४२ जागा जिंकल्या आणि जयंत पाटीलांपासून मनोहर नाईकांपर्यंत असे पक्षाचे सरदारच बहुतेक जिंकले होते. प्रभावी नेत्यांची मजबूत फळी हे राष्ट्रवादीचे गंडस्थळ, त्या गंडस्थळावरच हल्ला करण्याची खेळी भाजप-शिवसेनेकडून खेळली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असे सरदार आपल्या गळाला लावणे आधीच सुरू केले आहे.

शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय खेळीचा भाग म्हणून राज्याच्या विविध भागामध्ये राजकीय घराणी उभी केली आणि त्यांना ताकद देण्याचे काम केले. विखेंसारख्या काही घराण्यांना कायम सुरूंग लावण्याचेही अनेकदा प्रयत्न केले.भुजबळ सेनेच्या वाटेवरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दणका देत त्यावेळचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना पवारांनी काँग्रेसमध्ये आणून राज्यात वादळ निर्माण केले. तेच भुजबळ आज शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे म्हटले जाते.

सावल्यांनी साथ सोडलीकाँग्रेसच्या आदिवासी नेत्यांना शह देण्यासाठी शरद पवार यांनी मधुकर पिचड आणि विजयकुमार गावित यांना पुढे केले. आज दोघेही भाजपमध्ये आहेत. भुजबळांप्रमाणेच गणेश नाईक या कट्टर शिवसेना नेत्यास पवारांनी सोबत घेतले. तेच नाईक आज राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. पवारांना त्यांच्या सावल्या सोडून जात आहेत.

राजे तुम्ही सुद्धा!साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. पुसदच्या नाईक घराण्यातील निलय नाईक हे पूर्वीच भाजपमध्ये गेले आणि आता विधान परिषदेचे सदस्य आहेत. येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे आणखी काही नेते भाजप वा शिवसेनेत जाताना दिसतील.

भीती उरली नाहीज्या घराण्यांना पवारांनी बळ दिले त्याच घराण्यांतील सरदारांना आता त्यांच्यासोबत राहणे राजकीय असुरक्षिततेचे वाटत असल्याने एकेक जण साथ सोडून जात असल्याचे चित्र आहे. पवारांना साथ दिली नाही तर ते आपलं राजकारण संपवतील अशी भीती पूर्वी वाटायची. आज ती भीती राहिली नसल्याने त्यांची साथ सोडण्याचे धारिष्टय त्यांच्या जवळचे लोक करू लागले आहेत.सरदार पळू लागलेबीडच्या राजकारणाचा विचार ज्या क्षीरसागर घराण्याशिवाय करता येत नाही त्यातील जयदत्त क्षीरसागर यांनी साहेबांची साथ सोडून शिवबंधन बांधले आणि लगेच मंत्रीदेखील झाले. शिवसेनेला धक्का देत काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत गेलेले आ. भास्कर जाधव हे शिवसेनेच्या मार्गावर आहेत.सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे पवारांचे निष्ठावान पण ते उद्या शिवबंधन बांधून घेत आहेत. याच जिल्ह्यातील करमाळ्याच्या बागल परिवाराने नेहमीच पवारांना साथ दिली पण गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत अत्यल्प मतांनी पराभूत झालेल्या रश्मी बागल परवा शिवसेनेत गेल्या.अहमदनगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या शिवसेनेच्या मार्गावर असल्याचे म्हटले जाते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेChagan Bhujbalछगन भुजबळ