शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

भाजप, शिवसेनेच्या खेळीने राष्ट्रवादीच्या सरदारांची पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 05:07 IST

मोहिते, क्षीरसागर, पिचडांनंतर आता पद्मसिंह पाटलांचा नंबर

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपापल्या भागात प्रभाव असलेल्या नेत्यांचा (सरदारांचा) एकत्रित पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अशी या पक्षाची व्याख्या केली जाते, मग आता या सरदारांनाच आपल्याकडे ओढले तर आपोआपच या पक्षाला घरघर लागेल अशी रणनीती भाजप व शिवसेनेने आखली असून त्यानुसार एकेका सरदारांना आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा दोघांमध्ये सुरू आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आमचे कमीत कमी ५० आमदार नक्कीच निवडून येतील, असे छातीठोकपणे सांगत होते. ३५ नेते असे आहेत की जे त्या-त्या भागात अत्यंत प्रभावी आहेत आणि ते पराभूत होण्याचा प्रश्नच नाही, उर्वरित १५ जागा जिंकणे आमच्यासाठी कठीण नाही, असा तर्क त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते मांडत होते. ५० तर नाही पण राष्ट्रवादीने ४२ जागा जिंकल्या आणि जयंत पाटीलांपासून मनोहर नाईकांपर्यंत असे पक्षाचे सरदारच बहुतेक जिंकले होते. प्रभावी नेत्यांची मजबूत फळी हे राष्ट्रवादीचे गंडस्थळ, त्या गंडस्थळावरच हल्ला करण्याची खेळी भाजप-शिवसेनेकडून खेळली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असे सरदार आपल्या गळाला लावणे आधीच सुरू केले आहे.

शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय खेळीचा भाग म्हणून राज्याच्या विविध भागामध्ये राजकीय घराणी उभी केली आणि त्यांना ताकद देण्याचे काम केले. विखेंसारख्या काही घराण्यांना कायम सुरूंग लावण्याचेही अनेकदा प्रयत्न केले.भुजबळ सेनेच्या वाटेवरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दणका देत त्यावेळचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना पवारांनी काँग्रेसमध्ये आणून राज्यात वादळ निर्माण केले. तेच भुजबळ आज शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे म्हटले जाते.

सावल्यांनी साथ सोडलीकाँग्रेसच्या आदिवासी नेत्यांना शह देण्यासाठी शरद पवार यांनी मधुकर पिचड आणि विजयकुमार गावित यांना पुढे केले. आज दोघेही भाजपमध्ये आहेत. भुजबळांप्रमाणेच गणेश नाईक या कट्टर शिवसेना नेत्यास पवारांनी सोबत घेतले. तेच नाईक आज राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. पवारांना त्यांच्या सावल्या सोडून जात आहेत.

राजे तुम्ही सुद्धा!साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. पुसदच्या नाईक घराण्यातील निलय नाईक हे पूर्वीच भाजपमध्ये गेले आणि आता विधान परिषदेचे सदस्य आहेत. येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे आणखी काही नेते भाजप वा शिवसेनेत जाताना दिसतील.

भीती उरली नाहीज्या घराण्यांना पवारांनी बळ दिले त्याच घराण्यांतील सरदारांना आता त्यांच्यासोबत राहणे राजकीय असुरक्षिततेचे वाटत असल्याने एकेक जण साथ सोडून जात असल्याचे चित्र आहे. पवारांना साथ दिली नाही तर ते आपलं राजकारण संपवतील अशी भीती पूर्वी वाटायची. आज ती भीती राहिली नसल्याने त्यांची साथ सोडण्याचे धारिष्टय त्यांच्या जवळचे लोक करू लागले आहेत.सरदार पळू लागलेबीडच्या राजकारणाचा विचार ज्या क्षीरसागर घराण्याशिवाय करता येत नाही त्यातील जयदत्त क्षीरसागर यांनी साहेबांची साथ सोडून शिवबंधन बांधले आणि लगेच मंत्रीदेखील झाले. शिवसेनेला धक्का देत काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत गेलेले आ. भास्कर जाधव हे शिवसेनेच्या मार्गावर आहेत.सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे पवारांचे निष्ठावान पण ते उद्या शिवबंधन बांधून घेत आहेत. याच जिल्ह्यातील करमाळ्याच्या बागल परिवाराने नेहमीच पवारांना साथ दिली पण गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत अत्यल्प मतांनी पराभूत झालेल्या रश्मी बागल परवा शिवसेनेत गेल्या.अहमदनगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या शिवसेनेच्या मार्गावर असल्याचे म्हटले जाते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेChagan Bhujbalछगन भुजबळ