शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

वैफल्यग्रस्त भावनेतून अनंत गीतेंचं विधान; राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरेंनी घेतला खरपूस समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 13:01 IST

स्थानिक पातळीवर कलगीतुरा असण्याचं कारण नाही. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. रायगडमध्ये महाविकास आघाडी उत्तम काम करत आहे असं सुनील तटकरे म्हणाले.

ठळक मुद्देज्या स्थितीत हे सरकार स्थापन झालं ते ५ वर्षासाठी चांगले काम करेल. कुठल्याही नेत्याने बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. निवडणुकीत पराजय आणि नैराश्य आल्यानं असं विधान केले असावेशरद पवार हे महाविकास आघाडीचे जनक आहे. त्यांच्यावर बोलणं म्हणजे सूर्यावर थूंकण्याचा प्रकार

मुंबई - शरद पवार हे देशाचे नेते आणि महाविकास आघाडीचे जनक आहेत. भाजपाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनंत गीतेचा स्वाभिमान मागच्या निवडणुकीनंतर गळून पडला. वैफल्यग्रस्त भावनेतून अनंत गीते यांनी हे विधान केले. ज्यांना राजकीय स्थान उरलं नाही ते असे उपद्व्याप करत असतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी अनंत गीते(Anant Gite) यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

पत्रकार परिषद घेत खासदार सुनील तटकरे(Sunil Tatkare) म्हणाले की, देशाच्या राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे अढळ स्थान आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने त्याबद्दल बोलल्याने ते कमी होणार नाही. सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी अवस्था अनंत गीते यांची झाली आहे. स्वत:च्या सावलीला घाबरणारी माणसं असं करत असतात. चंद्रकांत पाटलांनी(BJP Chandrakant Patil) पाठीत खंजीर खुपसला हे वक्तव्य कुणाबद्दल केले हे सर्वांना माहिती आहे. चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेबद्दल जे विधान केले त्याबद्दल बोलण्याचं धाडस फक्त संजय राऊत यांनीच दाखवलं. परंतु शिवसेनेच्या जीवावर ६ वेळा निवडून त्याबद्दल काही बोलले नाही असं त्यांनी सांगितले.

“शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याची नार्को टेस्ट करा, एकच सत्य बाहेर येईल ते म्हणजे...

त्याचसोबत स्थानिक पातळीवर कलगीतुरा असण्याचं कारण नाही. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. रायगडमध्ये महाविकास आघाडी उत्तम काम करत आहे. स्थानिक शिवसेना(Shivsena) आमदारांसोबत चर्चा झाली. आमचं काम जिल्ह्यात सुरू आहे. ज्या स्थितीत हे सरकार स्थापन झालं ते ५ वर्षासाठी चांगले काम करेल. पुढच्या निवडणुकीतही ही आघाडी कायम राहील यात शंका नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन होताना जे काही घडलं त्याचा मी साक्षीदार आहे. हे सरकार भक्कम विचाराने स्थापन झालं आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात हे सरकार स्थापन झाले आहे. कुठल्याही नेत्याने बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. निवडणुकीत पराजय आणि नैराश्य आल्यानं असं विधान केले असावे असा टोला खासदार सुनील तटकरे यांनी अनंत गीतेंना लगावला.

दरम्यान, वैफल्यग्रस्त भावनेतून आणि निवडणुकीत पराजय झाल्याने त्यांनी असं विधान केले असावेत. शरद पवार हे महाविकास आघाडीचे जनक आहे. त्यांच्यावर बोलणं म्हणजे सूर्यावर थूंकण्याचा प्रकार आहे. राजकारणात अडगळीत पडल्यामुळे अनंत गीते यांना नैराश्य आलं आहे. शरद पवारांचं अढळ स्थान एखाद्या व्यक्तीनं बोलल्यावर कमी होणार नाही. अनंत गीते यांना समज देण्याबाबत शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे असंही सुनील तटकरेंनी स्पष्ट केले.

शरद पवार हे आमचे नेते नाहीत – अनंत गीते

मुख्यमंत्री आपला आहे म्हणून राज्यात सरकार आपले आहे. बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. महाविकास आघाडीचं सरकार आहे. सत्ता मविआ नेते सांभाळतील. तुमची आणि माझी जबाबदारी आपलं गाव सांभाळायचं आहे. त्यावेळी आम्हाला महाविकास आघाडीचा नव्हे तर शिवसेनेचाच विचार करायचा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांचे तोंड बघत होते का? या दोन्ही पक्षांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एकमेकांच्या विचाराचे होऊ शकत नाही मग शिवसेना काँग्रेसी विचारांची होऊ शकते का? राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं तरी आम्ही शिवसैनिक आहोत शिवसैनिकच राहणार. आपली ओळख आपण कधीही विसरता कामा नये. आमचा नेता फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत. इतर कुणीही होऊ शकत नाही. मग त्या नेत्याने काहीही उपाधी लावू दे. मग जाणता राजा असं स्वत:ला म्हणवलं तरीही ने आमचे नेते नाहीत. गुरु नाहीत. असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते(Anant Gite) यांनी शरद पवारांना लगावला.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेAnant Geeteअनंत गीतेShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारBJPभाजपा