शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतापले; "संभाजीराजे नव्हे तर संभाजी, शाहूंच्या विचारांचा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 17:25 IST

आजपर्यंत माझ्या गाडीपर्यंत येऊन हल्ला करण्याचं कुणी धाडस केली नाही. मी गाडी थांबवली पण ते उलटे पळून गेले असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी संभाजीराजेंवर पुन्हा जोरदार टीका केली. 

ठाणे - संभाजीराजे नाही तर संभाजींची चूकच होती, त्यांच्यामुळे विशालगडावर जे काही झाले त्यांच्याआड झालं. त्यांची भूमिका योग्य नव्हती. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांशी सुसंगत नव्हती हे मी आजही बोलतोय. एका हल्ल्याने मी घाबरणारा माणूस नाही. ड्रायव्हरनं गाडी थांबवून यूटर्न घेईपर्यंत हल्लेखोर पळाले असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या वाहनावरील झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली त्याचसोबत संभाजीराजे छत्रपती यांच्यावर निशाणा साधला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांचे जे रक्त होते ते सर्वांना बरोबर घेऊन जाणारे होते. भांडणं लावणारं रक्त नव्हते असा त्याचा अर्थ होता. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा १ टक्काही या संभाजींराजेंकडे नाही. जातीजातीत, धर्माधर्मात भांडण लावणारे शाहू महाराजांचे वंशज कसे होतील? ज्यांनी दगड मारलाय त्यांना माझी कारवाई व्यवस्थित समजावून सांगेन असं सांगत आव्हाडांनी सूचक इशारा दिला. 

तसेच माझं अंग गरम झालंय, हा भयानक हल्ला वैगेरे नव्हता. परंतु माझ्या गाडीवर आजपर्यंत कुणाची चालून येण्याची हिंमत नव्हती. मागून काय दगड मारता, समोर येऊन मारायचा ना XXX...मला कायदेशीर कारवाईमध्ये काही रस नाही माझी मी कारवाई करेन. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार, राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी त्यांचा राग व्यक्त केला. 

दरम्यान, त्यांनी त्यांचं काम केले, आम्ही आमचं काम करू. आम्ही धर्मनिरपेक्षता ठरवलीय ती पाळणार.. गजापूरला जाऊन संभाजीकडून विचारपूस करण्याची अपेक्षा होती. मात्र याच्या वागण्यामुळे आम्ही राजवाड्यावर येणार नाही असा निरोप तिथल्या लोकांनी पाठवला. आजचे खासदार शाहू छत्रपती हे स्वत: गजापूरला गेले, तिथे ३ तास त्यांच्याशी बोलले. कोल्हापूरनगरी पुरोगामित्वासाठी ओळखली जाते. संविधानाचं मूळ फुले शाहू आहेत. त्यांच्या वारसानं दंगल घडवण्यासाठी पुढाकार घेणं हे न शोभणारं आहे.  माफी मी मलो तरी मागणार नाही. त्यांची माफी मागितली पाहिजे, त्यांच्यामुळे एक मशिद पडली. माझी लढाई ही विचारांची आहे. विशालगडावर ते आरोपी आहेत असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती