शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतापले; "संभाजीराजे नव्हे तर संभाजी, शाहूंच्या विचारांचा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 17:25 IST

आजपर्यंत माझ्या गाडीपर्यंत येऊन हल्ला करण्याचं कुणी धाडस केली नाही. मी गाडी थांबवली पण ते उलटे पळून गेले असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी संभाजीराजेंवर पुन्हा जोरदार टीका केली. 

ठाणे - संभाजीराजे नाही तर संभाजींची चूकच होती, त्यांच्यामुळे विशालगडावर जे काही झाले त्यांच्याआड झालं. त्यांची भूमिका योग्य नव्हती. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांशी सुसंगत नव्हती हे मी आजही बोलतोय. एका हल्ल्याने मी घाबरणारा माणूस नाही. ड्रायव्हरनं गाडी थांबवून यूटर्न घेईपर्यंत हल्लेखोर पळाले असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या वाहनावरील झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली त्याचसोबत संभाजीराजे छत्रपती यांच्यावर निशाणा साधला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांचे जे रक्त होते ते सर्वांना बरोबर घेऊन जाणारे होते. भांडणं लावणारं रक्त नव्हते असा त्याचा अर्थ होता. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा १ टक्काही या संभाजींराजेंकडे नाही. जातीजातीत, धर्माधर्मात भांडण लावणारे शाहू महाराजांचे वंशज कसे होतील? ज्यांनी दगड मारलाय त्यांना माझी कारवाई व्यवस्थित समजावून सांगेन असं सांगत आव्हाडांनी सूचक इशारा दिला. 

तसेच माझं अंग गरम झालंय, हा भयानक हल्ला वैगेरे नव्हता. परंतु माझ्या गाडीवर आजपर्यंत कुणाची चालून येण्याची हिंमत नव्हती. मागून काय दगड मारता, समोर येऊन मारायचा ना XXX...मला कायदेशीर कारवाईमध्ये काही रस नाही माझी मी कारवाई करेन. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार, राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी त्यांचा राग व्यक्त केला. 

दरम्यान, त्यांनी त्यांचं काम केले, आम्ही आमचं काम करू. आम्ही धर्मनिरपेक्षता ठरवलीय ती पाळणार.. गजापूरला जाऊन संभाजीकडून विचारपूस करण्याची अपेक्षा होती. मात्र याच्या वागण्यामुळे आम्ही राजवाड्यावर येणार नाही असा निरोप तिथल्या लोकांनी पाठवला. आजचे खासदार शाहू छत्रपती हे स्वत: गजापूरला गेले, तिथे ३ तास त्यांच्याशी बोलले. कोल्हापूरनगरी पुरोगामित्वासाठी ओळखली जाते. संविधानाचं मूळ फुले शाहू आहेत. त्यांच्या वारसानं दंगल घडवण्यासाठी पुढाकार घेणं हे न शोभणारं आहे.  माफी मी मलो तरी मागणार नाही. त्यांची माफी मागितली पाहिजे, त्यांच्यामुळे एक मशिद पडली. माझी लढाई ही विचारांची आहे. विशालगडावर ते आरोपी आहेत असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती