शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Maharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्रातील बहाद्दर आमदारांनो! हिम्मत दाखवा, बेळगावमार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 22:52 IST

Maharashtra Karnataka Border Dispute: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटातील आमदारांना डिवचत खुले आव्हान दिले आहे.

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्न दिवसेंदिवस शिगेला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. या मुद्द्यावरून लोकसभेतही खडाजंगी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यातच राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी महाराष्ट्रातील आमदारांना बेळगावमार्गे कर्नाटकला जाऊन येण्याचे आव्हान दिले आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. महाराष्ट्र इतका कमजोर नाही की आमच्यावर कन्नडिगांनी हल्ला करावा आणि तो आम्ही सहन करावा. जर शरद पवार कर्नाटकमध्ये गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने त्याठिकाणी जाऊ. आंदोलन करू आणि बोमई यांना माफी मागायला भाग पाडू, अशा इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी दिला. यानंतर आता अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत खुले आव्हान दिले आहे. 

बेळगावमार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच

अमोल मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, सुरतमार्गे गुवाहाटी जाणाऱ्या महाराष्ट्रातील बहाद्दर आमदारांनो !  महाराष्ट्र संकटात आहे, हिंदुत्व धोक्यात आहे हिम्मत दाखवा, बेळगाव मार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच..., असे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे. तसेच यापूर्वी, सीमावाद पेटवायला दोन्ही राज्यातील भाजपचे सरकारच कारणीभूत. निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपुर्वक सिमावाद पेटवण्याचे दोन्ही राज्यातील सरकारकडून षडयंत्र, अशी टीकाही मिटकरींनी ट्विटरवरून केली होती. 

दरम्यान, प्रांतवाद चिघळला असून त्यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करत, राज्य सरकारला हा वाद राजकारणासाठी चालू ठेवायचा आहे. सातत्याने हा वाद वाढला पाहिजे अशा पद्धतीने सीमावाद हातळला जात आहे, असा गंभीर आरोपही एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :border disputeसीमा वादAmol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस