शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

टिळक, पुरंदरे आणि रामदास स्वामीचं गुणगान घेण्यासाठी सभा; छगन भुजबळांचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 15:12 IST

छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहे. पण तुम्ही शाहु, फुले आंबेडकर यांचे नाव का घेत नाही? असा सवाल करत हा द्वेष वाढविण्याचा प्रकार योग्य नाही असं त्यांनी म्हटलं.

नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद सभेनंतर राज्यात पुन्हा राष्ट्रवादीविरुद्ध मनसे असा राजकीय सामना रंगला आहे. राज ठाकरे यांनी शरद पवारांचे थेट नाव घेत त्यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राज्यात जातीवाद वाढला असा आरोप राज ठाकरेंनी केला. तसेच शरद पवार त्यांच्या भाषणात कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. प्रत्येकाकडे जातीने पाहतात असा आरोप राज ठाकरेंनी केला. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते प्रत्युत्तर देत आहेत.

मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) म्हणाले की, राज ठाकरेंनी लोकमान्य टिळक, पुरंदरे आणि रामदास स्वामी यांचे गुणगान गाण्यासाठी सभा घेतली होती. शरद पवारांना जातीयवादी ठरवण्यासाठी सभा होती. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहे. पण तुम्ही शाहु, फुले आंबेडकर यांचे नाव का घेत नाही? असा सवाल करत हा द्वेष वाढविण्याचा प्रकार योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. तर संभाजी भिडे यांनी आयुष्यभर मुस्लिम द्वेष पसरविला. ते सायकल वरून पडले, खुबा मोडला त्यांचे ऑपरेशन डॉ रियाज उमर मुजावर या मुस्लिम डॉक्टरने केले असंही ते म्हणाले.

तसेच राज ठाकरे यांनी मांडलेला इतिहास धादांत खोटा आहे. राज यांनी इतिहास तपासून बघावा, इंद्रजित सावंत या इतिहासकारने लिहिलेला दाखला आहे की, ३ एप्रिल १६८० मध्ये शिवाजी महाराज यांचे निधन झाले. संभाजी महाराज यांनी समाधी बांधली. त्यानंतर किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. त्यानंतर पेशव्यांनी जिंकला, १७७३ ते १८१८ पर्यंत समाधीचा उल्लेख कुठेही नाही, पेशव्यांनी सुद्धा समाधीकडे दुर्लक्ष केले असं इतिहास सांगतो. महात्मा फुले यांनी समाधी १८६९ साली शोधली. पाहिली शिवजयंती फुले यांनी साजरी केली. त्यावेळी टिळक केवळ १३ वर्षांचे होते. टिळकांनी सुद्धा समाधी चांगली बांधावी यासाठी फंड गोळा केला. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ निधी या नावाने निधी गोळा केला. उभ्या हयातीत टिळक यांनी एक खडा सुद्धा बसवला नाही. १९२६ ला इंग्रजांच्या फॉरेस्ट समितीने टिळकांना पत्र लिहून निधींचे काय झाले विचारले तेव्हा ज्या बँकेत पैसे ठेवले होते ती बँकच बुडाली असं सांगितले. त्यानंतर इंग्रजांनी शिवाजी महाराज यांनी चौथरा आणि छत्र बांधले. राज का चुकीचे बोलत होते कळले नाही. दिल्लीत नेहरू गांधी यांना बाजूला सारून नवा इतिहास दाखविला जातोय इथेही फुले, शाहु आंबेडकर यांना बाजूला सारून इतिहास लिहिला जातोय का? ज्यांनी काही केले नाही ते नाव घेत आहेत. दोन वेळा रायगडावर टिळक गेले एकदा रामदास स्वामी आणि नानासाहेब पेशवे यांचे फोटो पुजन केले. त्यांना शिवाजी महाराज स्मारक सापडले नाहीत असंही छगन भुजबळांनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेChhagan Bhujbalछगन भुजबळMNSमनसे