शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

परस्पर निर्णय घेता येणार नाही; राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेवर उदयनराजेंचं रोखठोक मत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 14:40 IST

राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का?, अशी चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का?, अशी चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे. शरद पवार पक्षाचं नेतृत्व करतील आणि राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून भाजपाशी लढतील, असं समीकरण मांडलं जातंय.हे पाऊल कार्यकर्त्यांना तरी कितपत रुचेल, पचेल, याबद्दल शंकाच आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते कुणाचंच काही ऐकायला तयार नाहीत. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशातील मुरब्बी राजकारणी शरद पवार यांना मात्र ते भेटले, त्यांच्याशी बोलले. या भेटीनंतर, राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का?, अशी चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू झाली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रोखठोक मत मांडलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चेबद्दल मला काही माहीत नाही. परंतु, हा निर्णय असाच घेता येणार नाही. माझ्याशी आणि इतर नेत्यांशी चर्चा करावी लागेल. पक्षाचे विलिनीकरण का करायचे, ते कोणत्या पक्षात करायचे, हे सगळं आम्हाला सांगितलं पाहिजे. सर्व नेत्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडली. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ५२ खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे यावेळीही त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकणार नाही. काँग्रेसच्या या अपयशाची जबाबदारी स्वीकारूनच राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अर्थात, पक्षातील नेत्यांना त्यांचं हे टोकाचं पाऊल पटलेलं नाही. परंतु, राहुल गांधी कुणाचंच ऐकायला तयार नाहीत. असं असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जातोय. शरद पवार पक्षाचं नेतृत्व करतील आणि राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून भाजपाशी लढतील, असं समीकरण मांडलं जातंय. अर्थात, दोघांपैकी कुठल्याच राजकीय पक्षाकडून काही ठोस संकेत दिले गेलेले नाहीत, पण पवार-राहुल भेटीनंतर चर्चा जोरात सुरू झालीय. हे पाऊल कार्यकर्त्यांना तरी कितपत रुचेल, पचेल, याबद्दल शंकाच असल्याचं उदयनराजेंच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट जाणवतं. 

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९