शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

“भाजपवाले शिवसेनेवर ‘त्या’ गोष्टीचा राग काढत आहेत”; राष्ट्रवादीचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 17:32 IST

सत्ता स्थापन करता आली नाही म्हणून भाजपाची तडफड सुरू असून, लोकांच्या आता ते लक्षात येत असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

मुंबई: आताच्या घडीला महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजपमध्ये सातत्याने विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता सक्तवसुली संचालनालयाने (ED) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती कंपनीवर कारवाई करत ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर टाच आणली. केंद्रीय संस्थेने थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांविरोधात कारवाई केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाल्याचे चित्र आहे. यावर प्रतिक्रिया देताना, भाजपवाले महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेवर राग काढत आहेत, असा मोठा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी यावर बोलताना भाजपवर टीका केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. तेव्हापासून वेगवेगळ्या विषयांवरुन सरकारला लक्ष्य करणे, सरकारमधील नेत्यांना लक्ष्य करणे, सरकार कसे कोसळेल, अस्थिरता कशी माजेल, लोकांमध्ये संभ्रम कसा निर्माण होईल याच्यासंदर्भात भाजपच्या अनेक नेत्यांकडून प्रयत्न केले जातात. काही जुने दाखले दिले जातात. सरकार स्थापन करता आले नाही म्हणून भाजप नेते महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेवर राग काढत आहेत, असे तपासे यांनी म्हटले आहे. 

भाजपाची ही तडफड असल्याचे लोकांच्या लक्षात येतेय

सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती इतिहास तोडून मोडून सांगण्याचा प्रयत्न करतात. जनता आता भोळी राहिलेली नसून सत्ता मिळाली नाही म्हणून भाजपाची ही तडफड सुरू असल्याचे लोकांच्या लक्षात येत आहे. सत्ता मिळाली नाही याचाच राग शिवसेनेवर काढण्याचा उपक्रम भाजपाकडून सुरु असल्याचा आरोप तपासे यांनी केला आहे. हा कारवाईचा स्वयंघोषित सपाटा आहे की, राजकीय हेतूने प्रेरित आहे हा चर्चेचा विषय आहे. त्यावर भाजपचे काही प्रवक्ते व्याख्यान करतात, बातमी सांगतात, भविष्य सांगतात. उद्याच्या चार दिवसानंतर अमुक अमुक व्यक्तीवर छापा पडेल, अमुक अमुक व्यक्तीची काहीतरी देवाण-घेवाण आहे, या शब्दांत तपासे यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. 

दरम्यान, माझा प्रश्न असा आहे इडी, सीबीआय, एनआय, लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणा, पोलीस या सर्व सरकारी यंत्रणांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण एखादी व्यक्ती जो त्या यंत्रणेचा सदस्य नाही, त्याचा जनसंपर्क अधिकारी नाही, तो त्या यंत्रणेने ठेवलेला व्यक्ती नाही. तरी त्यांना या गोष्टी अगाऊ कशा कळतात, अशी विचारणा तपासे यांनी केली आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा