शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

“भाजपवाले शिवसेनेवर ‘त्या’ गोष्टीचा राग काढत आहेत”; राष्ट्रवादीचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 17:32 IST

सत्ता स्थापन करता आली नाही म्हणून भाजपाची तडफड सुरू असून, लोकांच्या आता ते लक्षात येत असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

मुंबई: आताच्या घडीला महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजपमध्ये सातत्याने विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता सक्तवसुली संचालनालयाने (ED) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती कंपनीवर कारवाई करत ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर टाच आणली. केंद्रीय संस्थेने थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांविरोधात कारवाई केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाल्याचे चित्र आहे. यावर प्रतिक्रिया देताना, भाजपवाले महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेवर राग काढत आहेत, असा मोठा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी यावर बोलताना भाजपवर टीका केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. तेव्हापासून वेगवेगळ्या विषयांवरुन सरकारला लक्ष्य करणे, सरकारमधील नेत्यांना लक्ष्य करणे, सरकार कसे कोसळेल, अस्थिरता कशी माजेल, लोकांमध्ये संभ्रम कसा निर्माण होईल याच्यासंदर्भात भाजपच्या अनेक नेत्यांकडून प्रयत्न केले जातात. काही जुने दाखले दिले जातात. सरकार स्थापन करता आले नाही म्हणून भाजप नेते महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेवर राग काढत आहेत, असे तपासे यांनी म्हटले आहे. 

भाजपाची ही तडफड असल्याचे लोकांच्या लक्षात येतेय

सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती इतिहास तोडून मोडून सांगण्याचा प्रयत्न करतात. जनता आता भोळी राहिलेली नसून सत्ता मिळाली नाही म्हणून भाजपाची ही तडफड सुरू असल्याचे लोकांच्या लक्षात येत आहे. सत्ता मिळाली नाही याचाच राग शिवसेनेवर काढण्याचा उपक्रम भाजपाकडून सुरु असल्याचा आरोप तपासे यांनी केला आहे. हा कारवाईचा स्वयंघोषित सपाटा आहे की, राजकीय हेतूने प्रेरित आहे हा चर्चेचा विषय आहे. त्यावर भाजपचे काही प्रवक्ते व्याख्यान करतात, बातमी सांगतात, भविष्य सांगतात. उद्याच्या चार दिवसानंतर अमुक अमुक व्यक्तीवर छापा पडेल, अमुक अमुक व्यक्तीची काहीतरी देवाण-घेवाण आहे, या शब्दांत तपासे यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. 

दरम्यान, माझा प्रश्न असा आहे इडी, सीबीआय, एनआय, लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणा, पोलीस या सर्व सरकारी यंत्रणांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण एखादी व्यक्ती जो त्या यंत्रणेचा सदस्य नाही, त्याचा जनसंपर्क अधिकारी नाही, तो त्या यंत्रणेने ठेवलेला व्यक्ती नाही. तरी त्यांना या गोष्टी अगाऊ कशा कळतात, अशी विचारणा तपासे यांनी केली आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा