शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

“भाजपवाले शिवसेनेवर ‘त्या’ गोष्टीचा राग काढत आहेत”; राष्ट्रवादीचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 17:32 IST

सत्ता स्थापन करता आली नाही म्हणून भाजपाची तडफड सुरू असून, लोकांच्या आता ते लक्षात येत असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

मुंबई: आताच्या घडीला महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजपमध्ये सातत्याने विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता सक्तवसुली संचालनालयाने (ED) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती कंपनीवर कारवाई करत ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर टाच आणली. केंद्रीय संस्थेने थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांविरोधात कारवाई केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाल्याचे चित्र आहे. यावर प्रतिक्रिया देताना, भाजपवाले महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेवर राग काढत आहेत, असा मोठा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी यावर बोलताना भाजपवर टीका केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. तेव्हापासून वेगवेगळ्या विषयांवरुन सरकारला लक्ष्य करणे, सरकारमधील नेत्यांना लक्ष्य करणे, सरकार कसे कोसळेल, अस्थिरता कशी माजेल, लोकांमध्ये संभ्रम कसा निर्माण होईल याच्यासंदर्भात भाजपच्या अनेक नेत्यांकडून प्रयत्न केले जातात. काही जुने दाखले दिले जातात. सरकार स्थापन करता आले नाही म्हणून भाजप नेते महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेवर राग काढत आहेत, असे तपासे यांनी म्हटले आहे. 

भाजपाची ही तडफड असल्याचे लोकांच्या लक्षात येतेय

सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती इतिहास तोडून मोडून सांगण्याचा प्रयत्न करतात. जनता आता भोळी राहिलेली नसून सत्ता मिळाली नाही म्हणून भाजपाची ही तडफड सुरू असल्याचे लोकांच्या लक्षात येत आहे. सत्ता मिळाली नाही याचाच राग शिवसेनेवर काढण्याचा उपक्रम भाजपाकडून सुरु असल्याचा आरोप तपासे यांनी केला आहे. हा कारवाईचा स्वयंघोषित सपाटा आहे की, राजकीय हेतूने प्रेरित आहे हा चर्चेचा विषय आहे. त्यावर भाजपचे काही प्रवक्ते व्याख्यान करतात, बातमी सांगतात, भविष्य सांगतात. उद्याच्या चार दिवसानंतर अमुक अमुक व्यक्तीवर छापा पडेल, अमुक अमुक व्यक्तीची काहीतरी देवाण-घेवाण आहे, या शब्दांत तपासे यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. 

दरम्यान, माझा प्रश्न असा आहे इडी, सीबीआय, एनआय, लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणा, पोलीस या सर्व सरकारी यंत्रणांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण एखादी व्यक्ती जो त्या यंत्रणेचा सदस्य नाही, त्याचा जनसंपर्क अधिकारी नाही, तो त्या यंत्रणेने ठेवलेला व्यक्ती नाही. तरी त्यांना या गोष्टी अगाऊ कशा कळतात, अशी विचारणा तपासे यांनी केली आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा