आघाडीधर्माला राष्ट्रवादीचा खो

By Admin | Updated: August 20, 2014 00:45 IST2014-08-20T00:45:31+5:302014-08-20T00:45:31+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सर्व 288 मतदारसंघांमधील इच्छुकांच्या मुलाखती 25 ऑगस्टपासून सुरू करण्याचे ठरविले आहे.

NCP lost to Alliance | आघाडीधर्माला राष्ट्रवादीचा खो

आघाडीधर्माला राष्ट्रवादीचा खो

मुंबई : काँग्रेसने 2क्क्9च्या निवडणुकीत लढविलेल्या 174 विधानसभा मतदारसंघांमधील इच्छुकांच्या मुलाखती सुरू केलेल्या असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सर्व 288 मतदारसंघांमधील इच्छुकांच्या मुलाखती 25 ऑगस्टपासून सुरू करण्याचे ठरविले आहे. 
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाच्या सांसदीय मंडळाच्या उपस्थितीत या मुलाखती येथील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात होतील. पक्षाने 11 ते 2क् ऑगस्टदरम्यान सर्व 288 मतदारसंघांमधील इच्छुकांचे अर्ज मागविले होते. काँग्रेसनेही 288 मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागविले पण मुलाखती केवळ आपल्या वाटय़ाच्या 174 मतदारसंघांसाठीच घेतल्या. जागावाटपात काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी राष्ट्रवादीने ही खेळी केल्याचे  म्हटले जात आहे. 
काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपासाठी आजपासून दिल्लीत बैठकी सुरू होणार होत्या पण तसे होऊ शकले नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपलब्ध नसल्याने चर्चा होऊ शकली नसल्याचे सांगितले जात आहे. तथापि, आधी राज्यात आणि नंतर दिल्लीत चर्चा व्हावी, असा आग्रह काँग्रेसच्या नेत्यांनी धरल्याची माहिती आहे. 
राष्ट्रवादीतर्फे 25 ऑगस्टला ठाणो, पालघर, रायगड, र}ागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यांसाठी मुलाखती होतील. 26 ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील मुलाखती होतील. 27 ऑगस्टला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)

 

Web Title: NCP lost to Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.