शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

हर्षवर्धन पाटलांच्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मौन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 15:29 IST

२०१४ मध्ये स्वतंत्र लढलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे काही मतदारसंघ एक्सचेंज झाले आहे. इंदापूरमधून दत्तात्रय भरणे विजयी झाले. तर हर्षवर्धन यांचा पराभव झाला. परंतु, २०१९ मध्ये आघाडी होईल आणि इंदापूर मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळेल या आशेने पाटील काम करत होते.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदारपूरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या वाटेवर असल्याचा इशारा दिला आहे. परंतु, त्यांनी आपला निर्णय जाहीर केला नाही. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी संदर्भात अनेक गौप्यस्फोट केले. परंतु त्यावर राष्ट्रवादीकडून काहीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्याला बारामती मतदार संघातून निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती. परंतु, आपण राष्ट्रवादीला शब्द दिल्याचे त्यांना सांगितले. तसेच सुप्रिया सुळे यांना मदत करण्यासाठी राहुल गांधी यांनी आपल्याला सांगितले होते. तर शरद पवारांनी इंदापूरविषयी निश्चित राहा असंही सांगितले होते. मात्र आता त्यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे आपण आपली भूमिका १० सप्टेंबरला जाहीर करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. इंदापूरची जागा सोडायची होती, तर मग शिवस्वराज्य यात्रा इंदापूरमध्ये का आणली असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी तब्बल साडेचार वर्षांनी अजित पवार यांचा आपल्याला फोन आला होता, असा खुलासा करताना वाघ म्हटलं तरी चावत आणि वाघोबा म्हटल चावतं, असा टोलाही पाटील यांनी लगावला होता. पाटील यांच्या फटकेबाजीमुळे राष्ट्रवादीचं एकांगी राजकारण समोर आले आहे.

या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया येणे अपेक्षीत होते. परंतु, अद्याप राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यांने यावर प्रतिक्रिया दिली नाही. २०१४ मध्ये स्वतंत्र लढलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे काही मतदारसंघ एक्सचेंज झाले आहे. इंदापूरमधून दत्तात्रय भरणे विजयी झाले. तर हर्षवर्धन यांचा पराभव झाला. परंतु, २०१९ मध्ये आघाडी होईल आणि इंदापूर मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळेल या आशेने पाटील काम करत होते. परंतु, राष्ट्रवादी आग्रही असल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आक्रमक आहेत. तसेच पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत केली होती. त्या मदतीची राष्ट्रवादीकडून परतफेड होईल अशी अपेक्षा पाटील यांना होती.