शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तुमच्यासारख्या 'असुराचा' वध करायला मागे हटणार नाही; चाकणकरांची फडणवीसांवर जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 14:38 IST

स्त्री-पुरुष समानता समजून घेण्यामध्ये फडणवीस हे कुठे तरी कमी पडले आहेत.

मुंबई : राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी भाजपाने सरकारविरुद्ध आंदोलन पुकारले होते. त्यात, मुंबईतील आझाद मैदान येथील सभेत बोलताना वारिस पठाण यांच्या विधानावरुन फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. शिवसेनेनं बांगड्या भरल्या असतील, असे म्हणत टोला लगावला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्यामहिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे.

"फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना आम्ही शिवसेनाप्रमाणे बांगड्या घातल्या नसल्याचे वक्तव्य केले असून, त्या विधानाचे आम्ही निषेध करतो. बांगड्या हे महिलांचे आभूषण आहे. पौराणिक कथेमध्ये सुद्धा 'महिषासुर' नावाच्या असुराचा वध बांगड्या घातलेल्या देवीने केला होता, हे फडणवीस विसरले असतील. मात्र, आपल्या सारख्या नकारात्मक विचार असणाऱ्या 'असुराचा' वध करायला महाराष्ट्रातील रणरागिणी मागे हटणार नाही", असे चाकणकर म्हणाल्यात.

तर स्त्री-पुरुष समानता समजून घेण्यामध्ये फडणवीस हे कुठे तरी कमी पडले आहेत. त्यामुळे सातत्याने त्यांच्यामधील मनुवाद उफाळून येत आहे. कुठेतरी स्त्रियांना दुय्यम लेखायचं, त्यांच्यावर अत्याचार करायचा, अन्याय करायचा, त्यांच्या इज्जतीचे वावडे ओढत राहायचे ही त्यांच्या संस्कृती भाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांची फडणवीस यांनी माफी मागायला हवी, अशी मागणीही चाकणकर यांनी केली आहे.