शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

"…त्यावेळी लोक म्हणायचे सरकार ५ काय २५ वर्ष चालणार," अजित पवारांची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 13:23 IST

जर पुढची पिढी कर्तुत्ववान असेल त्याला मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे, अजित पवार यांचं वक्तव्य.

“आज शिंदे यांचं सरकार आहे. त्यात कोणाला घ्यायचं कोणाला कोणती खाती द्यायची याचा सर्वस्वी अधिकार हा एकनाथ शिंदेंचा आहे. त्याबद्दल त्यांना जे योग्य वाटलं. जोपर्यंत १४५ आमदारांचं पाठबळ त्यांच्या पाठिशी आहे, तोवर हे सरकार चालणार आहे. आम्ही देखील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये आलो तेव्हा लोक म्हणायचे ५ वर्ष काय २५ वर्ष सरकार चालणार. कार्यकर्त्यांना, आमदारांना बरं वाटायला सांगत असतात. कोणीही ताम्रपट घेऊन जन्मला आलेलं नाही. जोपर्यंत १४५ आमदारांची संख्या पाठिशी आहे तोवर हे सरकार चालणार,” असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी ध्वजारोहणानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

“उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा हॅलो ऐवजी जय महाराष्ट्र म्हटलं जायचं. प्रत्येकाचे विचार असतात. जय महाराष्ट्र म्हणणं देखील चांगली गोष्ट आहे. लोकशाहीच्या मार्गानं निवडून गेलेल्या आमदारांनी बहुमतानं अस्थित्वात आणलेलं हे सरकार आहे. आजचा दिवस टीका टिपण्णीचा नाही. सांस्कृतिक खात्याचे जे मंत्री आहेत, त्यांचं वक्तव्य ऐकलं. त्यात हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम म्हणण्याची त्यांनी भूमिका घेतली आहे,” असं अजित पवार विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

“आपल्याकडे लोकशाही आहे. त्यात परिवारवाद आणू शकत नाही. जर जनतेनं निवडून दिलं तर ते जाऊ शकतात. लोकांना त्यांचं काम आवडलं तर ते निवडून देतात. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा कार्यकाळ आपण पाहिला. ज्यांच्यात कुवत नाही, ताकद नाही, नेतृत्व नाही, त्यांना जर तुम्ही पदावर बसवलं तर त्याला घराणेशाही म्हणू शकतात. जर पुढची पिढी कर्तुत्ववान असेल त्याला मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे,” असं ते म्हणाले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारIndependence Dayस्वातंत्र्य दिनEknath Shindeएकनाथ शिंदे