शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

"…त्यावेळी लोक म्हणायचे सरकार ५ काय २५ वर्ष चालणार," अजित पवारांची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 13:23 IST

जर पुढची पिढी कर्तुत्ववान असेल त्याला मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे, अजित पवार यांचं वक्तव्य.

“आज शिंदे यांचं सरकार आहे. त्यात कोणाला घ्यायचं कोणाला कोणती खाती द्यायची याचा सर्वस्वी अधिकार हा एकनाथ शिंदेंचा आहे. त्याबद्दल त्यांना जे योग्य वाटलं. जोपर्यंत १४५ आमदारांचं पाठबळ त्यांच्या पाठिशी आहे, तोवर हे सरकार चालणार आहे. आम्ही देखील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये आलो तेव्हा लोक म्हणायचे ५ वर्ष काय २५ वर्ष सरकार चालणार. कार्यकर्त्यांना, आमदारांना बरं वाटायला सांगत असतात. कोणीही ताम्रपट घेऊन जन्मला आलेलं नाही. जोपर्यंत १४५ आमदारांची संख्या पाठिशी आहे तोवर हे सरकार चालणार,” असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी ध्वजारोहणानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

“उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा हॅलो ऐवजी जय महाराष्ट्र म्हटलं जायचं. प्रत्येकाचे विचार असतात. जय महाराष्ट्र म्हणणं देखील चांगली गोष्ट आहे. लोकशाहीच्या मार्गानं निवडून गेलेल्या आमदारांनी बहुमतानं अस्थित्वात आणलेलं हे सरकार आहे. आजचा दिवस टीका टिपण्णीचा नाही. सांस्कृतिक खात्याचे जे मंत्री आहेत, त्यांचं वक्तव्य ऐकलं. त्यात हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम म्हणण्याची त्यांनी भूमिका घेतली आहे,” असं अजित पवार विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

“आपल्याकडे लोकशाही आहे. त्यात परिवारवाद आणू शकत नाही. जर जनतेनं निवडून दिलं तर ते जाऊ शकतात. लोकांना त्यांचं काम आवडलं तर ते निवडून देतात. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा कार्यकाळ आपण पाहिला. ज्यांच्यात कुवत नाही, ताकद नाही, नेतृत्व नाही, त्यांना जर तुम्ही पदावर बसवलं तर त्याला घराणेशाही म्हणू शकतात. जर पुढची पिढी कर्तुत्ववान असेल त्याला मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे,” असं ते म्हणाले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारIndependence Dayस्वातंत्र्य दिनEknath Shindeएकनाथ शिंदे