शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

"…त्यावेळी लोक म्हणायचे सरकार ५ काय २५ वर्ष चालणार," अजित पवारांची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 13:23 IST

जर पुढची पिढी कर्तुत्ववान असेल त्याला मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे, अजित पवार यांचं वक्तव्य.

“आज शिंदे यांचं सरकार आहे. त्यात कोणाला घ्यायचं कोणाला कोणती खाती द्यायची याचा सर्वस्वी अधिकार हा एकनाथ शिंदेंचा आहे. त्याबद्दल त्यांना जे योग्य वाटलं. जोपर्यंत १४५ आमदारांचं पाठबळ त्यांच्या पाठिशी आहे, तोवर हे सरकार चालणार आहे. आम्ही देखील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये आलो तेव्हा लोक म्हणायचे ५ वर्ष काय २५ वर्ष सरकार चालणार. कार्यकर्त्यांना, आमदारांना बरं वाटायला सांगत असतात. कोणीही ताम्रपट घेऊन जन्मला आलेलं नाही. जोपर्यंत १४५ आमदारांची संख्या पाठिशी आहे तोवर हे सरकार चालणार,” असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी ध्वजारोहणानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

“उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा हॅलो ऐवजी जय महाराष्ट्र म्हटलं जायचं. प्रत्येकाचे विचार असतात. जय महाराष्ट्र म्हणणं देखील चांगली गोष्ट आहे. लोकशाहीच्या मार्गानं निवडून गेलेल्या आमदारांनी बहुमतानं अस्थित्वात आणलेलं हे सरकार आहे. आजचा दिवस टीका टिपण्णीचा नाही. सांस्कृतिक खात्याचे जे मंत्री आहेत, त्यांचं वक्तव्य ऐकलं. त्यात हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम म्हणण्याची त्यांनी भूमिका घेतली आहे,” असं अजित पवार विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

“आपल्याकडे लोकशाही आहे. त्यात परिवारवाद आणू शकत नाही. जर जनतेनं निवडून दिलं तर ते जाऊ शकतात. लोकांना त्यांचं काम आवडलं तर ते निवडून देतात. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा कार्यकाळ आपण पाहिला. ज्यांच्यात कुवत नाही, ताकद नाही, नेतृत्व नाही, त्यांना जर तुम्ही पदावर बसवलं तर त्याला घराणेशाही म्हणू शकतात. जर पुढची पिढी कर्तुत्ववान असेल त्याला मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे,” असं ते म्हणाले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारIndependence Dayस्वातंत्र्य दिनEknath Shindeएकनाथ शिंदे