शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

"…त्यावेळी लोक म्हणायचे सरकार ५ काय २५ वर्ष चालणार," अजित पवारांची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 13:23 IST

जर पुढची पिढी कर्तुत्ववान असेल त्याला मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे, अजित पवार यांचं वक्तव्य.

“आज शिंदे यांचं सरकार आहे. त्यात कोणाला घ्यायचं कोणाला कोणती खाती द्यायची याचा सर्वस्वी अधिकार हा एकनाथ शिंदेंचा आहे. त्याबद्दल त्यांना जे योग्य वाटलं. जोपर्यंत १४५ आमदारांचं पाठबळ त्यांच्या पाठिशी आहे, तोवर हे सरकार चालणार आहे. आम्ही देखील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये आलो तेव्हा लोक म्हणायचे ५ वर्ष काय २५ वर्ष सरकार चालणार. कार्यकर्त्यांना, आमदारांना बरं वाटायला सांगत असतात. कोणीही ताम्रपट घेऊन जन्मला आलेलं नाही. जोपर्यंत १४५ आमदारांची संख्या पाठिशी आहे तोवर हे सरकार चालणार,” असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी ध्वजारोहणानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

“उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा हॅलो ऐवजी जय महाराष्ट्र म्हटलं जायचं. प्रत्येकाचे विचार असतात. जय महाराष्ट्र म्हणणं देखील चांगली गोष्ट आहे. लोकशाहीच्या मार्गानं निवडून गेलेल्या आमदारांनी बहुमतानं अस्थित्वात आणलेलं हे सरकार आहे. आजचा दिवस टीका टिपण्णीचा नाही. सांस्कृतिक खात्याचे जे मंत्री आहेत, त्यांचं वक्तव्य ऐकलं. त्यात हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम म्हणण्याची त्यांनी भूमिका घेतली आहे,” असं अजित पवार विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

“आपल्याकडे लोकशाही आहे. त्यात परिवारवाद आणू शकत नाही. जर जनतेनं निवडून दिलं तर ते जाऊ शकतात. लोकांना त्यांचं काम आवडलं तर ते निवडून देतात. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा कार्यकाळ आपण पाहिला. ज्यांच्यात कुवत नाही, ताकद नाही, नेतृत्व नाही, त्यांना जर तुम्ही पदावर बसवलं तर त्याला घराणेशाही म्हणू शकतात. जर पुढची पिढी कर्तुत्ववान असेल त्याला मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे,” असं ते म्हणाले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारIndependence Dayस्वातंत्र्य दिनEknath Shindeएकनाथ शिंदे