शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

Coronavirus : भाजपची भाषा रामराज्याची आणि आता उत्तर प्रदेश, बिहार रामभरोसे : नवाब मलिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 15:02 IST

Coronavirus : युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत सापडले मृतदेह. राहुल गांधींनीही या प्रकरणावरून मोदींवर केली होती टीका

ठळक मुद्देयुपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत सापडले मृतदेह.राहुल गांधींनीही या प्रकरणावरून मोदींवर केली होती टीका

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भाजपाने रामराज्याची भाषा केली होती. परंतु दोन्ही राज्यांना भाजपने रामभरोसे सोडले असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. "उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये नदीमध्ये प्रेते टाकलेली आढळली आहेत. यमुना नदीत आणि हमिदपूरच्या नदीत तर गंगा नदीत ४० च्यावर मृतदेह दिसले आहेत. याठिकाणी परिस्थिती चांगली नाही हे यावरून स्पष्ट दिसत आहे. बिहारमध्ये चाचण्या होत नाहीयेत. डॉक्टर नाहीत. लोकं दिवसा डोळे उघडतात आणि संध्याकाळी मृत्यू होतोय. मृतदेह जाळण्यासाठी लाकडे नाहीत म्हणूनच नातेवाईक त्यांचे मृतदेह नदीत टाकत आहेत ही सत्य परिस्थिती आहे," असेही नवाब मलिक म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ जाहिराती करून सत्यापासून लांब पळत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

Anil Deshmukh ED : "राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून अनिल देशमुखांना बदनाम करण्यासाठी कारस्थान"राहुल गांधींकडूनही टीका "नद्यांमध्ये वाहणारे अमर्याद मृतदेह, रुग्णांच्या बाहेर मैलांपर्यंत रांग, जीवन सुरक्षेचा हक्कच हिरावून घेतला. पंतप्रधान, तो गुलाबी चष्मा उतरवा ज्यातून सेंट्रल विस्ताशिवाय काहीच दिसत नाही," असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर टीका केली.  युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत मृतदेहबिहारच्या बक्सर जिल्ह्यात नदीत मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडले होते. बिहारनंतर उत्तर प्रदेश, बिहार सीमेवरील गावातही मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडले होते. जे पाण्यावर तरंगत होते. कोरोना काळात लाकडांची कमतरता भासत असल्यानं लोकं हे मृतदेह थेट नदीत फेकत असल्याचं काही गावकऱ्यांचं म्हणणं होतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रnawab malikनवाब मलिकUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारyogi adityanathयोगी आदित्यनाथ