शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

Samruddhi Mahamarg: “टोल एवढा कसा? समृद्धी महामार्गाऐवजी लोक जुन्याच मार्गाने जाणे पसंत करतील”: जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 20:45 IST

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामर्गावर एवढा टोल लावण्याचे कारण काय, अशी विचारणा जयंत पाटील यांनी केली आहे.

Samruddhi Mahamarg: अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी समृद्धी महामार्गातील नागपूर-शिर्डी या महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण केले. अल्पावधीतच शेकडो वाहनांनी या समृद्धी महामर्गावरून प्रवास केला. या महामार्गाबाबत शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुकही केले जात आहे. यातच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या महामार्गाच्या टोलवरून सरकावर टीका करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी टोलबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत समृद्धी महामार्गाऐवजी लोक जुन्याच मार्गाने जाणे पसंत करतील, असा दावा केला आहे. 

समृद्धी महामार्गासाठी भरावा लागणारा टोल चर्चेचा विषय ठरत आहे. हा टोल सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहे. टोलच्या अवाजवी दरांचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून त्याबाबत सरकारला जाब विचारणार आहे. प्रचंड मोठी गुंतवणूक त्या प्रकल्पात झाली आहे. आम्ही विधानसभेत मुख्यमंत्री आणि त्या खात्याच्या मंत्र्यांना विचारू की हा टोल एवढा कसा? त्याचे काहीतरी गणित किंवा हिशोब असेल. या निर्णयाप्रत ते का आले? त्यांचे उत्तर जर योग्य नसेल, तर त्याविरोधात आवाज उठवेन, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे. 

समृद्धी महामार्गाऐवजी लोक जुन्याच मार्गाने जाणे पसंत करतील

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आत्ता जे टोलचे दर आहेत ते सामान्य माणसाला परवडणारे नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एका रस्त्याला टोल घेतला, तर लोक त्या रस्त्यावरून जाण्याऐवजी जुन्या मार्गाने जाणेच जास्त पसंत करतील. या रस्त्यावर इतका टोल लावण्याचे कारण काय? हे आम्ही त्यांना विधानसभेत विचारू. विदर्भातील जनतेसाठी ही फार मोठी अडचण आहे. रस्ता उत्तम आहेच. पण मग विमानही आहेच की. विमानाने जास्त लवकर येता येईल. त्यामुळे राज्य सरकारने स्वत: काहीतरी विचार केला पाहिजे. जनतेला कमी भुर्दंड ठेवला पाहिजे. तसे यात दिसत नाही. पण तरी सरकारची बाजू ऐकून घेतल्यावर आम्ही भूमिका व्यक्त करू, असे जयंत पाटील म्हणाले. 

दरम्यान, समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनांना एकूण १८ टोलनाके पार करावे लागणार आहेत. या एकूण ५२० किलोमीटर मार्गासाठी हलक्या वाहनांसाठी ८९९ रुपयांपर्यंत टोल भरावा लागणार आहे. मुंबईपासून थेट नागपूरपर्यंत ७०१ किलोमीटरचा पूर्ण प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांना जवळपास १२०० रुपये टोल भरावा लागणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गJayant Patilजयंत पाटीलState Governmentराज्य सरकार