शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

Maharashtra Politics: “चंद्रकांत पाटलांनी आत्ताच निवृत्ती घ्यावी, पाच-दहा वर्षे कशाला पाहिजे?”; एकनाथ खडसेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 1:21 PM

Maharashtra News: चंद्रकांत पाटील यांचा पिंड राजकारणी नाही, आता पक्षातले वातावरण त्यांना आवडत नसावे, असे एकनाथ खडसेंनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी भाजप-शिंदे गटावर निशाणा साधताना दिसत असून, शिंदे गट आणि भाजपचे नेतेही महाविकास आघाडीच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेताना दिसत आहेत. यातच भाजप नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या एका विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) टीका केली आहे. 

पुढील शंभर वर्षांची दृष्टी आपल्याकडे नाही, आणि आपल्याला त्यात रसही नाही. कारण आपल्याला अजून ५-१० वर्ष काम करुन जायचे, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या निवृत्तीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्याचे सांगितले जात आहे. यावरूनच एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांना खोचक शब्दांत टोला लगावत डिवचले आहे. 

पाच-दहा वर्षे कशाला पाहिजे?

पाच, दहा वर्षे कशाला पाहिजे? आताच घ्या ना. चंद्रकांत पाटील यांचा पिंड राजकारणी नाही, ते विद्यार्थी परिषदेचे काम करीत होते. त्यांचा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता. गेल्या काळात पक्षाने त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या; मात्र आता पक्षातले वातावरण त्यांना आवडत नसावे, या वातावरणात पुढच्या काळात राजकारण अवघड आहे असे वाटल्याने राजकारणापासून वेगळे होण्याचा विचार त्यांच्या मनात आला असेल, असे एकनाथ खडसे म्हणाले. 

दरम्यान, रक्ताची नाते कधी संपत नसतात, असे विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना उद्देशून केले होते. यावर बोलताना, पंकजा मुंडे यांनी काही तरी वक्तव्य केले म्हणून सुतावरून स्वर्ग गाठण्याची गरज नाही. राजकारणात नाते जोपासले पाहिजे. यातूनच ओघवत्या शब्दात पंकजा मुंडे या बोलल्या असाव्यात, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेchandrakant patilचंद्रकांत पाटील