शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

‘सत्तेचा ताम्रपट’वरुन अजितदादांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “राज्याचा कारभार उद्धव ठाकरे…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 14:19 IST

काही नेते समाजात तेढ, दुही निर्माण होईल, अशी विधाने करत कायदा हातात घेण्याची भाषा करत आहेत, ते योग्य नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

सांगली: मशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्यांविरोधात राज्यभर आंदोलन केले. मात्र, यावेळी पोलिसांनी शेकडो मनसे कार्यकर्त्यांविरोधात विविध प्रकारची कारवाई केली. या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक खरमरीत पत्र लिहिले. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

अयोध्या काय किंवा पंढरपूर, ही धार्मिक स्थळे प्रत्येकाची श्रद्धास्थाने आहेत. त्यामुळे इथे जाण्यासाठी कुणाचीच हरकत नाही. मात्र, सवंग लोकप्रियतेसाठी आणि जमलेच तर बिनखर्चाने जाता यावे म्हणून काहीजण अयोध्येला जाण्याचा बोभाटा करीत आहेत, अशा शेलक्या शब्दांत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याचवेळी त्यांनी कायदा हातात घेऊन किंवा कायद्याला आव्हान देत दोन समाजात तेढ निर्माण करण्याची भाषा करत असेल तर अशांविरुद्ध कायद्याने कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकशाहीत जनता ही सार्वभौम असते

काही राजकीय पक्षांचे नेते अलीकडे समाजात तेढ, दुही निर्माण होईल, अशी वक्तव्ये करून कायदा हातात घेण्याची भाषा करत आहेत ते योग्य नाही. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला येत नाही. लोकशाहीत जनता ही सार्वभौम असते. त्यामुळे हुकूमशाहीसारखी भाषा कुणी करू नये. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र संविधान, घटना आणि कायदा यापेक्षा कोणीही मोठा नाही. पुरोगामी महाराष्ट्रात महापुरुषांची नावे घेताना आम्ही त्यांच्या विचाराने वाटचाल करत आहोत. त्यामुळे राज्यात सलोखा राखण्याचे काम आम्ही करत आहोत. त्याला आव्हान देण्याची कृती करणाऱ्यांविरोधात सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. 

दरम्यान, राज्याचा कारभार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चालला आहे. त्याआधी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली होता. त्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे, विलासराव यांच्यासारख्या वेगवेगळ्या मान्यवरांनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे हे गेल्या अनेक वर्ष आपण पाहत आहतो. अशा पद्धतीने काम करताना काही अल्टिमेटम देतात, हेही बरोबर नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारRaj Thackerayराज ठाकरे