शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
2
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
3
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
4
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
5
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
6
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
7
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
8
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
9
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
10
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
11
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
12
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
13
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
14
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
15
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
16
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
17
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
18
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
19
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
20
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
Daily Top 2Weekly Top 5

‘सत्तेचा ताम्रपट’वरुन अजितदादांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “राज्याचा कारभार उद्धव ठाकरे…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 14:19 IST

काही नेते समाजात तेढ, दुही निर्माण होईल, अशी विधाने करत कायदा हातात घेण्याची भाषा करत आहेत, ते योग्य नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

सांगली: मशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्यांविरोधात राज्यभर आंदोलन केले. मात्र, यावेळी पोलिसांनी शेकडो मनसे कार्यकर्त्यांविरोधात विविध प्रकारची कारवाई केली. या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक खरमरीत पत्र लिहिले. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

अयोध्या काय किंवा पंढरपूर, ही धार्मिक स्थळे प्रत्येकाची श्रद्धास्थाने आहेत. त्यामुळे इथे जाण्यासाठी कुणाचीच हरकत नाही. मात्र, सवंग लोकप्रियतेसाठी आणि जमलेच तर बिनखर्चाने जाता यावे म्हणून काहीजण अयोध्येला जाण्याचा बोभाटा करीत आहेत, अशा शेलक्या शब्दांत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याचवेळी त्यांनी कायदा हातात घेऊन किंवा कायद्याला आव्हान देत दोन समाजात तेढ निर्माण करण्याची भाषा करत असेल तर अशांविरुद्ध कायद्याने कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकशाहीत जनता ही सार्वभौम असते

काही राजकीय पक्षांचे नेते अलीकडे समाजात तेढ, दुही निर्माण होईल, अशी वक्तव्ये करून कायदा हातात घेण्याची भाषा करत आहेत ते योग्य नाही. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला येत नाही. लोकशाहीत जनता ही सार्वभौम असते. त्यामुळे हुकूमशाहीसारखी भाषा कुणी करू नये. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र संविधान, घटना आणि कायदा यापेक्षा कोणीही मोठा नाही. पुरोगामी महाराष्ट्रात महापुरुषांची नावे घेताना आम्ही त्यांच्या विचाराने वाटचाल करत आहोत. त्यामुळे राज्यात सलोखा राखण्याचे काम आम्ही करत आहोत. त्याला आव्हान देण्याची कृती करणाऱ्यांविरोधात सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. 

दरम्यान, राज्याचा कारभार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चालला आहे. त्याआधी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली होता. त्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे, विलासराव यांच्यासारख्या वेगवेगळ्या मान्यवरांनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे हे गेल्या अनेक वर्ष आपण पाहत आहतो. अशा पद्धतीने काम करताना काही अल्टिमेटम देतात, हेही बरोबर नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारRaj Thackerayराज ठाकरे