शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘सत्तेचा ताम्रपट’वरुन अजितदादांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “राज्याचा कारभार उद्धव ठाकरे…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 14:19 IST

काही नेते समाजात तेढ, दुही निर्माण होईल, अशी विधाने करत कायदा हातात घेण्याची भाषा करत आहेत, ते योग्य नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

सांगली: मशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्यांविरोधात राज्यभर आंदोलन केले. मात्र, यावेळी पोलिसांनी शेकडो मनसे कार्यकर्त्यांविरोधात विविध प्रकारची कारवाई केली. या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक खरमरीत पत्र लिहिले. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

अयोध्या काय किंवा पंढरपूर, ही धार्मिक स्थळे प्रत्येकाची श्रद्धास्थाने आहेत. त्यामुळे इथे जाण्यासाठी कुणाचीच हरकत नाही. मात्र, सवंग लोकप्रियतेसाठी आणि जमलेच तर बिनखर्चाने जाता यावे म्हणून काहीजण अयोध्येला जाण्याचा बोभाटा करीत आहेत, अशा शेलक्या शब्दांत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याचवेळी त्यांनी कायदा हातात घेऊन किंवा कायद्याला आव्हान देत दोन समाजात तेढ निर्माण करण्याची भाषा करत असेल तर अशांविरुद्ध कायद्याने कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकशाहीत जनता ही सार्वभौम असते

काही राजकीय पक्षांचे नेते अलीकडे समाजात तेढ, दुही निर्माण होईल, अशी वक्तव्ये करून कायदा हातात घेण्याची भाषा करत आहेत ते योग्य नाही. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला येत नाही. लोकशाहीत जनता ही सार्वभौम असते. त्यामुळे हुकूमशाहीसारखी भाषा कुणी करू नये. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र संविधान, घटना आणि कायदा यापेक्षा कोणीही मोठा नाही. पुरोगामी महाराष्ट्रात महापुरुषांची नावे घेताना आम्ही त्यांच्या विचाराने वाटचाल करत आहोत. त्यामुळे राज्यात सलोखा राखण्याचे काम आम्ही करत आहोत. त्याला आव्हान देण्याची कृती करणाऱ्यांविरोधात सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. 

दरम्यान, राज्याचा कारभार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चालला आहे. त्याआधी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली होता. त्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे, विलासराव यांच्यासारख्या वेगवेगळ्या मान्यवरांनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे हे गेल्या अनेक वर्ष आपण पाहत आहतो. अशा पद्धतीने काम करताना काही अल्टिमेटम देतात, हेही बरोबर नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारRaj Thackerayराज ठाकरे