शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फॉर्मात आलेल्या राष्ट्रवादीत ऐन प्रचाराच्या काळात सावळा गोंधळ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 17:56 IST

एकूणच राष्ट्रवादीमधील या घडामोडी कुटनितीचा भाग असण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी वाट्याला आलेल्या जागेवर एबी फॉर्म न देणे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे शरद पवारांनी फॉर्मात आणलेल्या राष्ट्रवादीत सावळा गोंधळ सुरू झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाला आलेली मरगळ आणि दिग्गज नेते सोडून गेल्यामुळे गलीगात्र झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षप्रमुख शरद पवार यांनी उभारी देण्याचे काम केले. पवारांच्या झंझावाती दौऱ्यांमुळे तरुणांमध्ये पवारांविषयी आकर्षण वाटू लागले आणि त्यातून सहानुभुती तयार होऊ लागली. यामुळे राष्ट्रवादी मुसंडी मारणार अशी स्थिती निर्माण झाली असताना ऐन प्रचाराच्या काळात पक्षात सावळा गोंधळ सुरू झाल्याचं दिसत आहे.

उमेदवारी देण्यापासूनच राष्ट्रवादीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शरद पवार यांनी सभेतूनच बीडचे पाच उमेदवार जाहीर करणे हा सर्वांसाठी धक्का होता. मात्र त्यातील एक उमेदवार भाजपमध्ये जाणे हे त्यापेक्षा धक्कादायक होते. या घटनेपासूनच राष्ट्रवादीत सावळ्या गोंधळाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार फुटण्याचा अनुभव याआधी बीडच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीला आला होता.

एक गोंधळ संपतो ना संपतो की उमेदवारीसाठी एबी फॉर्म देण्यावरूनही गडबड झाली. तर पैठणमध्ये एकाचवेळी दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यामुळे उमेदवारांसह मतदार संघात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. हा फंडा आणखी काही मतदार संघातही वापरण्यात आला होता.दरम्यान चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने उमेदवाराला एबी फॉर्मच दिला नाही. तर भोसरीत शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे निवडणूक न लढवता राष्ट्रवादीला काय साधायचं होतं, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित होत आहे. हे सगळं सुरू असताना राष्ट्रवादीकडून चिंचवडमध्ये शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांना पाठिंबा देण्याची घाई करण्यात आली. मात्र काँग्रेसने यापासून स्वत:ला वेगळ करून घेतलं.

या व्यतिरिक्त खुद्द अजित पवारांनी सोलापूरमधील राष्ट्रवादीच्याच दोन उमेदवारांविरुद्ध भूमिका घेतली. या दोघांना राष्ट्रवादीने खुद्द उमेदवारी जाहीर केली होती. करमाळ्यातून संजय पाटील यांना तर सांगोल्यातून दीपक साळुंखे यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. आता अजित पवारांवरच या उमेदवारांविरोधात भूमिका घेण्याची नामुष्की ओढवली. त्यांनी करमाळ्यात संजय शिंदे यांना तर सांगोल्यात शेकापचे अनिकेत देशमुख यांना पाठिंबा दर्शविला आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविणारे संजय शिंदे आता अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

एकूणच राष्ट्रवादीमधील या घडामोडी कुटनितीचा भाग असण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी वाट्याला आलेल्या जागेवर एबी फॉर्म न देणे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे शरद पवारांनी फॉर्मात आणलेल्या राष्ट्रवादीत ऐन प्रचाराच्या काळात सावळा गोंधळ सुरू झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.