शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

Maharashtra Politics: “शिंदे-फडणवीसांची सत्ता जास्त काळ टिकणार नाही, आपल्या विचारांचे सरकार लवकरच येईल”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 09:19 IST

Maharashtra News: शिंदे-फडणवीस सरकार कोसळून पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. बंडखोरी करण्यात आलेल्या आमदारांपैकी १६ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. शिंदे-फडणवीस यांचे सरकार कोसळण्याबाबत अनेक तारखा, भाकिते करण्यात आली आहेत. यातच महाविकास आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही, आपल्या विचारांचे सरकार लवकरच येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमुळे सध्या सर्व राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्यानिमित्ताने अनेक नेत्यांचे दौरे आता विविध भागात सुरु आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकार कोसळ्याबाबत भाष्य केले आहे. ज्या दिवशी या सरकारवर अपात्रतेची कारवाई होईल त्या दिवशी हे सरकार पडणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या डोक्यावर अपात्रेची टांगती तलवार आहे, असेही पाटील यांनी सांगितले. 

हेही सरकार कधीही कोसळेल

महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेचे आमदार फुटले त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यामुळे या शिंदे गटातील आमदारांवर जर अपात्रतेची कारवाई झाली तर हेही सरकार कधीही कोसळेल आणि आपल्या विचारांचे सरकार येणार असल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा एकत्रच होईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच आम्ही कामाला लागलो आहोत. अलीकडे अनेक घटक एकत्र येऊन चर्चा करत आहेत. २०२४ मध्ये आजच्याप्रमाणे निराशाजनक चित्र नसेल. लोक आता हुशार झालेत.  आपण मतदान केलेल्या नेत्याने पक्षबदल केल्यावर त्या नेत्यालाच लोक मनातून काढून टाकतात. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल आणि फडणवीसांसाठी आमच्याकडून सरप्राइज असेल, असे जयंत पाटील म्हणाले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडी