शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Maharashtra Political Crisis: “एखाद्या वेळेस सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामतीत शरद पवारांचा पराभव होणे शक्यच नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 18:57 IST

Maharashtra Political Crisis: यापूर्वी अनेकांनी बारामतीला टार्गेट करून खोदून पाहिले, पण कोणाला पाणी लागले नाही, असा टोला राष्ट्रवादीने भाजपला लगावला आहे.

Maharashtra Political Crisis: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी रणनीति आखण्यास हळूहळू सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे भाजप विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील असून, दुसरीकडे विरोधक भाजपला तगडी टक्कर देण्यासाठी मजबूत आघाडी करण्यावर भर देताना दिसत आहेत. यातच राज्यातही भाजपने बारामतीसह अन्य लोकसभा मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केले असून, केंद्रीय नेते त्या त्या मतदारसंघात जाऊन आढावा घेत आहेत. यावर राष्ट्रवादीकडून पलटवार करण्यात आला असून, एखाद्या वेळेस सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामतीत शरद पवारांचा (Sharad Pawar) पराभव होणे शक्यच नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

एखाद्या वेळी सूर्य पश्चिमेला उगवेल. मात्र शरद पवारांची साथ बारामतीकर कधी सोडणार नाहीत. बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव बारामतीकर होऊ देणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आतापर्यंत अनेकांनी बारामतीला टार्गेट केले, येथे खोदून पाहिले, पण पाणी काही लागले नाही, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला. 

भाजपचे हे प्रचार तंत्र आहे

भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे यंदा 'मिशन महाराष्ट्र' बरोबर 'मिशन बारामती' असल्याचे विधान करत शरद पवार टार्गेट असल्याचे स्पष्ट केले होते. यापूर्वी अनेकांनी बारामती टार्गेट करून खोदून पाहिले, पण कोणाला पाणी लागले नाही. त्यामुळे हा प्रयत्न आजचा नाही. भाजपचे हे प्रचार तंत्र आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकांवरील सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्याबद्दल जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, वेळ लागू शकतो पण एवढा ही वेळ लागू नये,की विधानसभेची मुदत संपेल. आता याबाबत एकदा सुनावणी सुरू झाल्यास ती लवकर पूर्ण करून निर्णय दिल्यास महाराष्ट्रातील सर्व गोष्टी क्लिअर होतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवार