शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

“शिंदेंची सत्ता, ते CM असेपर्यंत पक्षप्रवेश होतील, नंतर...”; जयंत पाटलांनी सांगितले राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 16:55 IST

Maharashtra Politics: अहमदनगरला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचे समर्थनच केले पाहिजे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षांची तयारीला सुरुवात झालेली असतानाच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नेतेमंडळी स्वतःचा पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. केवळ ठाकरे गट नाही, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक जण शिवसेना शिंदे गटात जाताना दिसत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. 

शिंदे गटासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मीडियाशी बोलाताना जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये गेले असल्याने पक्षातील निष्ठावंत अशा भाजप सहकाऱ्यांना कुठे बसवायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे, असा खोचक टोला लगावत, भाजपचा अंतर्गत प्रश्न असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आणि आता शिंदे गटातील लोक नव्याने कधी भाजपवासी होतील, हे सांगता येणार नाही. या सर्वांच्या ओझ्याखाली निष्ठावंत कार्यकर्ते मागे ढकलले गेले आहेत. भारतीय जनता पक्षात ती अस्वस्थता मोठी आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला. 

शिंदेंची सत्ता, ते मुख्यमंत्री असेपर्यंत पक्षप्रवेश होतील, नंतर...

शिंदे गटात गेलेले काही लोक आताच मला भेटले. शिंदे गटात गेलेले आहेत ते तात्पुरते गेले आहेत. शिंदेंची सत्ता आहे, शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत सोयी सवलती मिळत असल्याने लोक तिथे जात आहेत. त्यामुळे तिथे गेलेल्या लोकांसाठी आम्ही काही बोलत नाही. एका कार्यकर्त्याने सांगितले की सहा महिने जातो, निधी आणतो आणि परत येतो. महत्त्वाच्या कार्यकर्त्याने अशी परवानगी मागितली. नगरपालिकेत निधी येणे गरजेचे आहे. मी जाऊन या म्हटले, अशी मिश्किल टिप्पणी जयंत पाटील यांनी केली. 

दरम्यान, अहमदनगरला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचे समर्थनच केले पाहिजे. याला विरोध करणे आम्ही योग्य समजत नाही. चौंडीला अहिल्यादेवी होळकरांचे वास्तव्य होते. आम्ही संपूर्ण गावाच्या सुधारणांसह निधी द्यायचे काम सुरू केले होते. ते गाव विकसित झाले आहे. चौंडीला अहिल्यादेवी होळकरांचे स्थान असल्याने त्या जिल्ह्याला महत्त्व आहे, असे जयंत पाटील यांनी नमूद केले. 

 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे