शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

“शिंदेंची सत्ता, ते CM असेपर्यंत पक्षप्रवेश होतील, नंतर...”; जयंत पाटलांनी सांगितले राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 16:55 IST

Maharashtra Politics: अहमदनगरला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचे समर्थनच केले पाहिजे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षांची तयारीला सुरुवात झालेली असतानाच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नेतेमंडळी स्वतःचा पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. केवळ ठाकरे गट नाही, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक जण शिवसेना शिंदे गटात जाताना दिसत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. 

शिंदे गटासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मीडियाशी बोलाताना जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये गेले असल्याने पक्षातील निष्ठावंत अशा भाजप सहकाऱ्यांना कुठे बसवायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे, असा खोचक टोला लगावत, भाजपचा अंतर्गत प्रश्न असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आणि आता शिंदे गटातील लोक नव्याने कधी भाजपवासी होतील, हे सांगता येणार नाही. या सर्वांच्या ओझ्याखाली निष्ठावंत कार्यकर्ते मागे ढकलले गेले आहेत. भारतीय जनता पक्षात ती अस्वस्थता मोठी आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला. 

शिंदेंची सत्ता, ते मुख्यमंत्री असेपर्यंत पक्षप्रवेश होतील, नंतर...

शिंदे गटात गेलेले काही लोक आताच मला भेटले. शिंदे गटात गेलेले आहेत ते तात्पुरते गेले आहेत. शिंदेंची सत्ता आहे, शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत सोयी सवलती मिळत असल्याने लोक तिथे जात आहेत. त्यामुळे तिथे गेलेल्या लोकांसाठी आम्ही काही बोलत नाही. एका कार्यकर्त्याने सांगितले की सहा महिने जातो, निधी आणतो आणि परत येतो. महत्त्वाच्या कार्यकर्त्याने अशी परवानगी मागितली. नगरपालिकेत निधी येणे गरजेचे आहे. मी जाऊन या म्हटले, अशी मिश्किल टिप्पणी जयंत पाटील यांनी केली. 

दरम्यान, अहमदनगरला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचे समर्थनच केले पाहिजे. याला विरोध करणे आम्ही योग्य समजत नाही. चौंडीला अहिल्यादेवी होळकरांचे वास्तव्य होते. आम्ही संपूर्ण गावाच्या सुधारणांसह निधी द्यायचे काम सुरू केले होते. ते गाव विकसित झाले आहे. चौंडीला अहिल्यादेवी होळकरांचे स्थान असल्याने त्या जिल्ह्याला महत्त्व आहे, असे जयंत पाटील यांनी नमूद केले. 

 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे