शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Andheri Bypoll: “ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंना एकनाथ शिंदेंनी गळाला लावले तर...”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 12:50 IST

Andheri Bypoll: भाजप पक्ष सत्तेविना राहू शकत नाही. त्यामुळेच साम-दाम-दंड-भेद वापरुन उमेदवार पळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई: सध्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून (Andheri Bypoll) जोरदार रणधुमाळी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता दुहेरी संकट उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने आक्षेप घेतला असून, प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनाच गळाला लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढवली जाणार आहे. यातच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवून केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला नवे नाव आणि चिन्ह दिले आहे. यानंतर आता ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असून, खुद्द एकनाथ शिंदे सक्रीय झाल्याचे सांगितले जात आहे. यावरून जयंत पाटील यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 

ठाकरे गटाचा उमेदवार शिंदे गटाने पळवणे, ही योग्य बाब आहे का?

अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचा उमेदवार शिंदे गटाने पळवणे, ही योग्य बाब आहे का? भाजप पक्ष सत्तेविना राहू शकत नाही. त्यामुळेच भाजपने शिवसेना पक्ष फोडला. शिवसेनेतील बंडाळी भाजपप्रणित होती. आता अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे त्याला साम-दाम-दंड-भेद वापरुन पळवायचा प्रयत्न सुरु आहे. ही महाराष्ट्रातील जनतेला आवडणारी गोष्ट नाही. अंधेरीत मराठी भाषिकांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे तिथला निकाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण आता ठाकरे गटाचा तिथला उमेदवारच पळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशाने पुढच्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात कोणता उमेदवार उभा राहणार नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, हिंदुत्वाची मते जातील आणि आपल्याला सत्तेत येता येणार नाही यातूनच भाजपने शिवसेना पक्ष फोडला. शिवसेना फोडल्याचे खापर कोणावर तरी फोडायचे म्हणून भाजपकडून राष्ट्रवादीचे नावे घेतले जाते, असा दावा करत महाराष्ट्रभर शिवसेनेच्या आमदारांशी आमचे चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरेंच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आहे, ती कोणाच्या घरी आहे हे थोड्या दिवसांनी कळेल, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे