शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

Andheri Bypoll: “ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंना एकनाथ शिंदेंनी गळाला लावले तर...”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 12:50 IST

Andheri Bypoll: भाजप पक्ष सत्तेविना राहू शकत नाही. त्यामुळेच साम-दाम-दंड-भेद वापरुन उमेदवार पळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई: सध्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून (Andheri Bypoll) जोरदार रणधुमाळी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता दुहेरी संकट उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने आक्षेप घेतला असून, प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनाच गळाला लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढवली जाणार आहे. यातच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवून केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला नवे नाव आणि चिन्ह दिले आहे. यानंतर आता ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असून, खुद्द एकनाथ शिंदे सक्रीय झाल्याचे सांगितले जात आहे. यावरून जयंत पाटील यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 

ठाकरे गटाचा उमेदवार शिंदे गटाने पळवणे, ही योग्य बाब आहे का?

अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचा उमेदवार शिंदे गटाने पळवणे, ही योग्य बाब आहे का? भाजप पक्ष सत्तेविना राहू शकत नाही. त्यामुळेच भाजपने शिवसेना पक्ष फोडला. शिवसेनेतील बंडाळी भाजपप्रणित होती. आता अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे त्याला साम-दाम-दंड-भेद वापरुन पळवायचा प्रयत्न सुरु आहे. ही महाराष्ट्रातील जनतेला आवडणारी गोष्ट नाही. अंधेरीत मराठी भाषिकांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे तिथला निकाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण आता ठाकरे गटाचा तिथला उमेदवारच पळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशाने पुढच्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात कोणता उमेदवार उभा राहणार नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, हिंदुत्वाची मते जातील आणि आपल्याला सत्तेत येता येणार नाही यातूनच भाजपने शिवसेना पक्ष फोडला. शिवसेना फोडल्याचे खापर कोणावर तरी फोडायचे म्हणून भाजपकडून राष्ट्रवादीचे नावे घेतले जाते, असा दावा करत महाराष्ट्रभर शिवसेनेच्या आमदारांशी आमचे चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरेंच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आहे, ती कोणाच्या घरी आहे हे थोड्या दिवसांनी कळेल, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे