शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “शरद पवारांमुळेच उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले, आरोप करणे म्हणजे मुर्खपणाचे”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 08:48 IST

Maharashtra News: शिंदे गटाने शरद पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Maharashtra Politics: राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शिंदे गटातील नेत्याने केलेल्या टीकेला आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रत्युत्तर दिले असून, शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले. शरद पवारांवर आरोप करणे मुर्खपणाचे आहे, असा पलटवार एकनाथ खडसे यांनी केला. 

शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी शरद पवारांवर टीका करताना अनेक आरोप केले. शरद पवार यांनी सन २०१४ पासून नियोजनबद्ध पद्धतीने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, असे विजय शिवतारे यांनी म्हटले होते. याला एकनाथ खडसे यांनी उत्तर देताना शिंदे गटावर निशाणा साधला. 

शरद पवारांनी अनेक माणसे मोठे केली

शरद पवार हे बर्मुडा ट्रँगल आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांनी अनेक माणसं मोठे केली आहेत ती पाहावीत. शरद पवार यांच्यावर आरोप करणे म्हणजे मूर्खपणा आहे.  शरद पवार यांनी एका रात्रीत महाविकास आघाडी निर्माण केली. या राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणली. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र सरकार आले आणि ते अडीच वर्ष चालले. आता सुरु असलेले राजकारण राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य नाही, या शब्दांत एकनाथ खडसे यांनी विजय शिवतारेंवर हल्लाबोल केला. 

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले की, सरसेनापती बाळासाहेबांनी ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा मिळवून दिली, त्याच्या जोरावर महाराष्ट्रामधील अनेक सत्ता केंद्रांवर त्यांनी सत्ता मिळवली. राज्य सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री झाले. ही वर्षानुवर्षाची पुण्याई आहे ती दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली, यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा. याला कोण जबाबदार आहे, कोण नाही, हे तर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावरच समजेल. परंतु, तात्पुरते का होईना निवडणूक चिन्ह गोठवणे हे अत्यंत क्लेशदायक आहे अशी खंत एकनाथ खडसेंनी बोलून दाखवली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेSharad Pawarशरद पवारVijay Shivtareविजय शिवतारे