शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “पहिल्यांदा अशी तत्परता दाखवणारे राज्यपाल पाहिले”; पवारांचा कोश्यारींना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 18:02 IST

Maharashtra Political Crisis: बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी खूपच तत्परता दाखवली, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

औरंगाबाद: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. मात्र, त्यापूर्वी एकनाथ शिंहे यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केली. यानंतर राज्यात पराकोटीला गेलेल्या सत्तासंघर्षामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली. या सत्तासंघर्षात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या भूमिकेवरूनही जोरदार टीका करण्यात आली. यानंतर एका जवळपास आठवड्याभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावर भाष्य केले असून, अशी तत्परता दाखवणारे पहिलेच राज्यपाल पाहिले, असा टोला लगावला आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर काही दिवसांच्या अंतराने भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्याबाबत पत्र दिले होते. यानंतर लगेचच राज्यपालांनी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले. शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्याने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. या घडामोडींवरून शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

पहिल्यांदा अशी तत्परता दाखवणारे राज्यपाल पाहिले

बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी खूपच तत्परता दाखवली. पहिल्यांदा अशी तत्परता दाखवणारे राज्यपाल पाहिले. ४८ तासाच्या आत बहुमत चाचणीचा निर्णय राज्यपालांनी दिला, असा टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच सर्वोच्च न्यायालयात ११ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीबाबत बोलताना, न्यायपालिकेवर माझा पूर्ण विश्वास आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. 

नामांतराचा निर्णय घेणार हे मला माहिती नव्हते

नामांतराचा निर्णय घेणार हे मला माहिती नव्हते. नामांतराच्या निर्णयाबाबत योग्य पद्धतीने माहिती देण्यात आली नाही. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करताना सुसंवाद साधला गेला नाही. थेट मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर झाल्यावरच याबाबत समजले. नामांतराच्या मुद्द्यावर हवी तशी चर्चा झाली नाही. नामांतरापेक्षा इतर मूलभूत प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे होते. नामांतराचा मुद्दा हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.  

दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचे बंड एका दिवसात झालेले नाही. खूप दिवसांपासून बंडाची तयारी केली गेली असेल. मात्र, या बंडाच्या निर्णयाला काहीच आधार नाही. त्यामुळे भविष्यात बंडखोरांना जनतेसमोर येऊन खरे कारण सांगावे लागेल. मध्यावधी निवडणुका लागतील असे मी म्हणालो नाही. पुढील निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागा असे सांगितले आहे. आपल्या हातात दोन वर्ष आहे. हे लक्षात ठेऊन कामाला लागले पाहिजे. सन २०२४ साली निवडणूक एकत्र लढवावी अशी मनस्थिती आहे. मविआ म्हणून एकत्र लढावे अशी माझी इच्छा आहे. पण, अद्याप एकत्र लढवण्यावर चर्चा नाही. जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा ठरवू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSharad Pawarशरद पवारbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी