शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
3
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
4
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
5
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
6
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
7
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
8
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
9
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
10
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
11
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
12
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
13
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
14
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
15
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
16
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
17
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
18
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
19
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
20
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण

Maharashtra Political Crisis: नामांतरावरुन शरद पवार उद्धव ठाकरेंवर नाराज; म्हणाले, “मला माहितीच नव्हते”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 17:32 IST

Maharashtra Political Crisis: हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करताना सुसंवाद साधला गेला नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. मात्र, त्यापूर्वी एकनाथ शिंहे यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केली. यानंतर राज्यात पराकोटीला गेलेल्या सत्तासंघर्षामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली. उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यानंतर एका जवळपास आठवड्याभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावर भाष्य केले असून, नामांतराच्या प्रस्तावाबाबत काहीच माहिती नव्हते, असा दावा केला आहे. 

शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेकविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे गटाचे बंड एका दिवसात झालेले नाही. खूप दिवसांपासून बंडाची तयारी केली गेली असेल. मात्र, या बंडाच्या निर्णयाला काहीच आधार नाही. त्यामुळे भविष्यात बंडखोरांना जनतेसमोर येऊन खरे कारण सांगावे लागेल. मध्यावधी निवडणुका लागतील असे मी म्हणालो नाही. पुढील निवडणुकांसाठी आतापासूनच तयारीला लागा असे सांगितले आहे. आपल्या हातात दोन वर्ष आहे. हे लक्षात ठेऊन कामाला लागले पाहिजे. सन २०२४ साली निवडणूक एकत्र लढवावी अशी मनस्थिती आहे. मविआ म्हणून एकत्र लढावे अशी माझी इच्छा आहे. पण, अद्याप एकत्र लढवण्यावर चर्चा नाही. जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा ठरवू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

नामांतराचा निर्णय घेणार हे मला माहिती नव्हते

नामांतराचा निर्णय घेणार हे मला माहिती नव्हते. नामांतराच्या निर्णयाबाबत योग्य पद्धतीने माहिती देण्यात आली नाही. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करताना सुसंवाद साधला गेला नाही. थेट मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर झाल्यावरच याबाबत समजले. नामांतराच्या मुद्द्यावर हवी तशी चर्चा झाली नाही. नामांतरापेक्षा इतर मूलभूत प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे होते. नामांतराचा मुद्दा हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.  

दरम्यान, बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी खूपच तत्परता दाखवली. पहिल्यांदा अशी तत्परता दाखवणारे राज्यपाल पाहिले. ४८ तासाच्या आत बहुमत चाचणीचा निर्णय राज्यपालांनी दिला, असा टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच सर्वोच्च न्यायालयात ११ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीबाबत बोलताना, न्यायपालिकेवर माझा पूर्ण विश्वास आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी