शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

“जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, कोणत्या जातीचे किती लोक हे एकदा कळू द्यावे”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 19:55 IST

Sharad Pawar News: एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी जातिनिहाय जनगणनेबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

Sharad Pawar News: बिहारच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी समोर आली आहे. यानंतर आता विविध राज्यांतून जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे, याबाबतची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, असे ठाम मत व्यक्त केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी जातिनिहाय जनगणनेबाबत प्रतिक्रिया दिली. 

कोणता समाज किती टक्के आहे? याबद्दलची माहिती मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कोणत्या जातीचे किती लोक आहेत, हे एकदा लोकांना कळू द्यावे. त्याचे चित्र पुढे ठेवल्यानंतर जो सगळ्यात दुबळा आहे. त्याच्यासाठी देशाची, राज्याची शक्ती वापरण्याची ख-या अर्थाने आवश्यकता आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

पाणी, जंगल, जमीन या सगळ्याचा आदिवासी मालक आहे

आदिवासींना वनवासी म्हटले जाते. आदिवासी या देशातील संस्कृतीचा घटक आहे. पाणी, जंगल, जमीन या सगळ्याचा आदिवासी मालक आहे. त्यांना तुम्ही या मार्गाने जा, पूजा अर्चा करा अशा प्रकारची भूमिका सांगितली जाते. ही भूमिका मान्य नसल्याचे आदिवासी तरुणांनी शिवनेरीच्या पायथ्याशी माझ्यापुढे मांडली आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भटक्या विमुक्तांचे प्रश्न अनेक असून आजचे राजकर्ते या प्रश्नांबाबत किती जाणकार, जागरुक आहेत. प्रश्नांची सोडवणूक करण्याची भावना त्यांच्या अंतकरणामध्ये कितपत आहे. याबद्दल शंका व्यक्त करावी अशी स्थिती आहे. एकेकाळी सोलापूर, बारामतीत भटक्या समाजातील घटकांना गुन्हेगार ठरवून त्यांना तारांच्या कुंपणात ठेवले जात होते. स्वातंत्र्याच्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी सोलापूरमध्ये जाऊन कुंपनाच्या तारा तोडल्या. आमच्याकडे सत्ता असताना जाणीवपूर्वक सवलती दिल्या. आजही फार मोठा वर्ग एका वेगळ्या स्थितीत राहत आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. पण, त्यासाठी राज्यकर्त्यांची मानसिकता बदलली पाहिजे, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड