शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांचा हल्ला; शरद पवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 06:57 IST

देशात सत्ता आहे. मात्र, महाराष्ट्रात सत्ता नसल्याने विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची सत्ता धोक्यात आणण्यासाठी दरदिवशी नवनवी षडयंत्रे रचली जात आहेत.

अमरावती :

देशात सत्ता आहे. मात्र, महाराष्ट्रात सत्ता नसल्याने विरोधक अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची सत्ता धोक्यात आणण्यासाठी दरदिवशी नवनवी षडयंत्रे रचली जात आहेत. ईडी, सीबीआय चौकशी हे खेळणे करून ठेवले आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर कसे होईल, याचे स्वप्न विरोधक बघत आहेत. एसटी कामगारांच्या आड घरावर झालेला हल्ला हे त्याचेच द्योतक आहे. एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांनीच तो हल्ला घडवून आणला, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रविवारी येथे केला.

अमरावतीत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय संवाद बैठकीला संबोधित करताना ते म्हणाले, देशात बेरोजगारी, महागाई यासारखे अनेक बिकट प्रश्न असताना त्यावरून लक्ष वळविण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना अस्थिर करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होत आहे. मी गत ४० ते ५० वर्षांपासून एसटी कामगारांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी आघाडीवर आहे. घरावर हल्ला करण्यामागे मी कामगारांना दोष देणार नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. सर्वसामान्य एसटी कामगारांना भडकावले. कारण नेतृत्व चुकीचे होते, असे ते म्हणाले. 

राजकारणात मी अनेक संकटे जवळून बघितली आहेत. मुंबईचा बॉम्बस्फोट असो वा किल्लारीचा भूकंप. मुंबईत दंगली झाल्या तेव्हा हिंदू व मुस्लीम भागातही जाऊन भेटी घेतल्या. शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला आणि सोमवारी मुंबई पुन्हा धावली. मात्र, अलीकडे सांप्रदायिक शक्तींकडून एका चित्रपटाच्या नावाने हिंदू समाजात अस्वस्थता पसरविण्याचे काम सुरू आहे, असे सांगून संविधानावर विश्वास असलेल्या विचारसरणींनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी मंचावर खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते आदी उपस्थित होते. दरम्यान, पवार यांनी अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. 

नागपूर विमानतळ झाले पोलीस छावणीशरद पवार यांचे रविवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन व त्यानंतर तापलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. प्रचंड पोलीस बंदोबस्तात पवार अमरावतीच्या दिशेने रवाना झाले. पवार यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पक्ष कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, अशी अपेक्षा होती; परंतु मोठे पदाधिकारी व निवडक कार्यकर्ते दिसून आले. सुरक्षेच्या दृष्टीने मर्यादित कार्यकर्त्यांची उपस्थिती असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस