शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Amol Mitkari : "जाहिर सभा, उत्तर सभा आता वाट 'पुरवणी' सभेची; प्रश्न राष्ट्रवादीचे अन् उत्तर BJP च्या C टीमचे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 10:57 IST

NCP Amol Mitkari And MNS Raj Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी राज यांना खोचक टोला लगावला आहे.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आपल्या भाषणात नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्याचे सांगत असतात. ते कुणीही नाकारू शकत नाही. परंतु, शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना दिसत नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या आधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. शरद पवार नास्तिक, देव मानत नाहीत, देवळात हात जोडतानाचा फोटो सापडणार नाही, या शब्दांत शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (NCP Amol Mitkari) यांनी राज यांना खोचक टोला लगावला आहे.

"सभेत फक्त आणि फक्त मनोरंजन आणि प्रश्नच प्रश्न... वाऱ्याला लाथा मारणारी पुरवणी सभा झालीच पाहिजे" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ""जाहिर सभा", "उत्तर सभा"  आता वाट "पुरवणी सभेची"... सभेत फक्त आणि फक्त मनोरंजन आणि प्रश्नच प्रश्न... वाऱ्याला लाथा मारणारी पुरवणी सभा झालीच पाहिजे. प्रश्न राष्ट्रवादीचे उत्तर BJP च्या C टीमचे" असं मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच "शिव शाहू फुले आंबेडकरांची" चळवळ अजून जिवंत आहे इतके लक्षात असू द्या असंही म्हटलं आहे. 

"भडकाऊ भाषण देऊन महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी "शिव शाहू फुले आंबेडकरांची" चळवळ अजून जिवंत आहे इतके लक्षात असू द्या. छत्रपती शिवाजी महाराज विरुद्ध फुले-शाहू-आंबेडकर अशी वेगळी मांडणी करण्याचा केविलवाणा प्रयत्न महाराष्ट्राने हाणून पाडलाय #विझलेला दिवा" असं देखील मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना दिसणार नाहीत. छत्रपतींचे नाव घेतल्यावर मुस्लीम मते जातील ही शरद पवारांना भीती आहे, असा दावा करताना अफझल खान वीणा वर्ल्डचे तिकीट काढून महाराष्ट्र दर्शनाला आला होता का, अशी खोचक विचारणा राज ठाकरे यांनी केली. 

शरद पवारांनी आपल्या पद्धतीने राजकारण केले. बाबासाहेब पुरंदरेंमुळे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले हे कुणीही अमान्य करणार नाही. शिवाजी महाराजांवर अनेकांनी लिहिले आहे, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले. शरद पवार यांच्याकडे घेण्यासारखे अनेक गुण आहेत. मात्र, स्वार्थी राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीयद्वेष महाराष्ट्रात पसरला, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. प्रत्येक जातीचा माणूस शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी लढला. शिवरायांचा इतिहास घराघरात पोहोचणे महत्त्वाचे आहे. मात्र, तो कुणी लिहिला, यावरून राजकारण केले गेले. जाती-पातीत महाराष्ट्र अडकला गेला. महाराष्ट्राला कुणीही हरवू शकत नाही, मात्र राज्यातील जातीचे राजकारणच आपल्याला हरवेल, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच अनेक संघटना स्थापन झाल्या.  महाराष्ट्रात जाती होत्याच पण राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद महाराष्ट्रात आला. जातीयद्वेष पसरला, असा मोठा आरोप राज ठाकरे यांनी केला.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण