शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

Maharashtra Political Crisis: “हे बरे नाही शिंदेसाहेब, फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 11:00 IST

Maharashtra Political Crisis: राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेट विना एकहाती सरकार असून, या खेळात मात्र सामान्य जनता होरपळत चालली असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन होऊन एक महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. एकीकडे शिगेला पोहोचलेल्या सत्तासंघर्षाचा पेच सर्वोच्च न्यायालयात गेला असून, दुसरीकडे नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तारीख पे तारीख सुरू असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी, एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या नादाला लागून  राज्य अधोगतीकडे नेत असल्याची टीका केली आहे. 

नव्या शिंदे-भाजप सरकार सत्तेत येऊन महिना लोटला आहे. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडत नाही. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी आक्रमक होताना दिसत आहेत. बंडखोर आमदारांमध्ये एकमत होत नसल्यानेच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा दावा करण्यात येत आहे. उलट येत्या दोन ते तीन दिवसांत निश्चितपणे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा कयास बांधला जात आहे. यातच अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधत शिंदे गटाला टोला लगावला आहे. 

फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात

शिंदे सरकारला ३५ दिवस पूर्ण. राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेट विना एकहाती सरकार. या खेळात मात्र सामान्य जनता होरपळत चालली आहे. जे चालवलय ते बरे नाही शिंदे साहेब. फडणवीसांच्या नादाला लागुन आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात, अशी टीका करणारे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे. दुसरीकडे, गेल्या महिनाभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर शुक्रवारी ५ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजपाचे ८ आणि शिंदे गटाचे ७ जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी राजभवनात तयारी सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, राज्यात भाजपा-शिंदे गट यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. त्यात भाजपाचे ११६ आणि शिंदे गटाचे ५० आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्रिपद सोडून बंडात सहभागी होणाऱ्या नेत्यांना मंत्री बनवावेच लागणार आहे. त्याचसोबत प्रादेशिक समतोल साधणे नव्या सरकारसमोर आव्हान आहे. नेमका मंत्रिमंडळ विस्तार का रखडला याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAmol Mitkariअमोल मिटकरीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार