शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Maharashtra Political Crisis: “हे बरे नाही शिंदेसाहेब, फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 11:00 IST

Maharashtra Political Crisis: राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेट विना एकहाती सरकार असून, या खेळात मात्र सामान्य जनता होरपळत चालली असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन होऊन एक महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. एकीकडे शिगेला पोहोचलेल्या सत्तासंघर्षाचा पेच सर्वोच्च न्यायालयात गेला असून, दुसरीकडे नव्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तारीख पे तारीख सुरू असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी, एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या नादाला लागून  राज्य अधोगतीकडे नेत असल्याची टीका केली आहे. 

नव्या शिंदे-भाजप सरकार सत्तेत येऊन महिना लोटला आहे. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडत नाही. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी आक्रमक होताना दिसत आहेत. बंडखोर आमदारांमध्ये एकमत होत नसल्यानेच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा दावा करण्यात येत आहे. उलट येत्या दोन ते तीन दिवसांत निश्चितपणे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा कयास बांधला जात आहे. यातच अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधत शिंदे गटाला टोला लगावला आहे. 

फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात

शिंदे सरकारला ३५ दिवस पूर्ण. राज्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा कॅबिनेट विना एकहाती सरकार. या खेळात मात्र सामान्य जनता होरपळत चालली आहे. जे चालवलय ते बरे नाही शिंदे साहेब. फडणवीसांच्या नादाला लागुन आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात, अशी टीका करणारे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे. दुसरीकडे, गेल्या महिनाभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर शुक्रवारी ५ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजपाचे ८ आणि शिंदे गटाचे ७ जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी राजभवनात तयारी सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, राज्यात भाजपा-शिंदे गट यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. त्यात भाजपाचे ११६ आणि शिंदे गटाचे ५० आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्रिपद सोडून बंडात सहभागी होणाऱ्या नेत्यांना मंत्री बनवावेच लागणार आहे. त्याचसोबत प्रादेशिक समतोल साधणे नव्या सरकारसमोर आव्हान आहे. नेमका मंत्रिमंडळ विस्तार का रखडला याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAmol Mitkariअमोल मिटकरीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार