शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘देवेंद्र’पेक्षा ‘हितेंद्र’ पॉवरफुल ठरणार, कितीही लोटांगण घाला; राष्ट्रवादीचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 16:50 IST

हितेंद्र ठाकूर यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह भाजप नेत्यांनीही त्यांची भेट घेतली.

मुंबई: आताच्या घडीला राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Vidhan Parishad Election 2022) राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला असला, तरी या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महाविकास आघाडीने जय्यत तयारी केली आहे. विधान परिषद निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या भेटीगाठी वाढताना दिसत आहेत. यातच महाविकास आघाडीसह भाजपच्या नेत्यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्या भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सूचक विधान केले आहे. 

बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंतर भाजपच्या मनीषा चौधरी यांच्यासह अन्य नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे. 

‘देवेंद्र’पेक्षा ‘हितेंद्र’ पॉवरफुल ठरणार

अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले असून, ‘देवेंद्र’पेक्षा ‘हितेंद्र’ पॉवरफुल ठरणार. कितीही लोटांगण घाला, असा टोला यामध्ये लगावण्यात आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी राज्यसभा निवडणुकीत अतिशय जबरदस्त ठरली होती. त्यामुळेच भाजपचा विजय झाला. शेवटच्या क्षणापर्यंत भाजपने आपले पत्ते खुले केले नाहीत. राज्यसभेचा निकाल लागेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांनी विधिमंडळातच तळ ठोकला होता. यानंतर आता भाजपची रणनीति नेमकी काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

हितेंद्र ठाकूर यांच्या भूमिकेकडे लक्ष

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मते फुटली नाहीत. तर अपक्ष आणि लहान पक्षांनी कोणाच्या पारड्यात मतदान केले याचे आखाडे अजूनही बांधले जात आहेत. त्यातच विधान परिषदेची निवडणूक ही गुप्त मतदानाने पार पाडली जाते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप कोणतीही जोखीम घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. विधानसभेतील लहान पक्ष आणि अपक्षांना वळवण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू आहेत. यातच बहुजन विकास आघाडीकडे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील अशी तीन मते आहेत. या तीन मतांसाठी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी हितेंद्र ठाकूर काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. 

दरम्यान, विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेप्रमाणे मतदान झाले तर भाजपकडे १२३ संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपच्या ४ जागा सहज निवडून येऊ शकतात. पाचव्या उमेदवारासाठी भाजपला १२ मते कमी पडतात. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे १६१ संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधानपरिषदेत जातील. तसेच मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसच्या वाट्यालाही दोन जागा येऊ शकतात. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकHitendra Thakurहितेंद्र ठाकूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmol Mitkariअमोल मिटकरी