शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

Maharashtra Political Crisis: “शिंदे गटाला भाजपमध्ये विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, महाराष्ट्रात लवकरच महाभारत!”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 09:57 IST

Maharashtra Political Crisis: मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना फडणवीस आणि शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द झाल्यावरून राष्ट्रवादीने टीका केली आहे.

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवे सरकार स्थापन होऊन आता महिना होत आला तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी वाढली असून, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडत नाही. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी महाराष्ट्रात लवकरच महाभारत घडणार असल्याचे सूतोवाच केले आहे.  

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द झाला. त्यामुळे विस्तार आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शिंदे आता दिल्लीत परत कधी जाणार, हेही निश्चित नाही. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि काही बैठकांनंतर शिंदे दिल्लीला रवाना होणार होते. दिल्लीत त्यांचा मुक्काम होता. ते कोणाला भेटणार, याबाबत त्यांच्या कार्यालयाने कोणतीही माहिती दिली नाही. राज्यातील राजकीय परिस्थितीसंदर्भातील न्यायालयीन प्रकरणाबाबत काही ज्येष्ठ वकिलांशी ते चर्चा करणार होते आणि भाजपच्या श्रेष्ठींनादेखील विस्ताराच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी भेटणार होते, अशी माहिती आहे. यावरून अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. 

महाराष्ट्रात लवकरच महाभारत!

शिंदे गटाला भाजपमध्ये विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, असेच साधारण सर्व घडामोडींवरून चित्र निर्माण झाले आहे, असा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रद्द झालेल्या दिल्ली दौऱ्यांवरून महाराष्ट्रात लवकरच महाभारत घडणार असल्याचे सूतोवाच अमोल मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहेत. तसेच अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप खासदार अनिल बोंडे यांचाही खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. अजितदादाइतके आठवड्यातून एक दिवस तरी काम करून दाखवा, बारा तासाच्या आत दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागेल. त्यांची बरोबरी तुम्हाला सात जन्मही करता येणार नाही. तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बळीराजाला वाऱ्यावर सोडून दिल्लीवारी करताहेत यावर जरा तोंड उघडा, या शब्दांत अमोल मिटकरींनी अनिल बोंडे यांना सुनावले आहे. 

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गुरुवारी दिल्लीला जात आहेत. ते २९ जुलै रोजी मुंबईत परततील. त्यामुळे दोन दिवस तरी विस्तार होणार नाही, असे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आतापर्यंत चारवेळा दिल्लीला जाऊन आले आहेत.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmol Mitkariअमोल मिटकरी