शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

Maharashtra Political Crisis: “दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत”; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 11:21 IST

Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाहणी दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचे पहिले अधिवेशन सुरू आहे. विरोधी बाकांवर बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नव्या शिंदे-फडणवीस सरकावर अनेक मुद्द्यांवरून टीका केली जात आहे. यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा प्रश्न आघाडीवर आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी दौरा करत बळीराजाला झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. 

अब्दुल सत्तार हे नांदेड दौऱ्यावर होते. जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या आढावा बैठकीत अब्दुल सत्तार यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या पाच दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया जुलैमध्ये संपली आहे. तथापि, काही भागात जुलैपासून मुसळधार पाऊसही पडला आहे आणि याचा हिशेब घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारकडून बाधितांसाठी मदत योजना तयार करण्यात येत आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यानंतर अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांनी रात्रीच्या अंधारात बांधावर जाऊन नुकसान पाहणी केल्यावरून टोला लगावला आहे. 

अंधारात पिकाचे नुकसान पाहणारे हे दिव्य पुरुष खरंच धन्य 

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा नांदेड भागात शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करायला कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे रात्री अंधारात गेले. अंधारात पिकाचे नुकसान पाहणारे हे दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत, असा खोचक टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. तत्पूर्वी अब्दुल सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. याबाबत बोलताना, अशोक चव्हाण यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला गेलो होतो. अशोक चव्हाण यांना मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्राविषयी चांगले ज्ञान आणि समज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीही त्यांना चांगली जाण आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्यासोबतच मी कृषिमंत्री म्हणून माझे खाते सांभाळण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेईन, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, यापूर्वी अमोल मिटकरींनी केलेल्या एका ट्विटमध्ये, सत्ताधाऱ्यांना वारंवार सांगावे लागते आहे, हे सरकार गोर गरिबांसाठी काम करते आहे, हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, याचं कारण "५० खोके एकदम ओके" हे  चांगलच झोंबलेलं दिसतंय, असा टोला लगावला. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAmol Mitkariअमोल मिटकरीAbdul Sattarअब्दुल सत्तारNandedनांदेड