शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Maharashtra Political Crisis: “दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत”; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 11:21 IST

Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाहणी दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचे पहिले अधिवेशन सुरू आहे. विरोधी बाकांवर बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नव्या शिंदे-फडणवीस सरकावर अनेक मुद्द्यांवरून टीका केली जात आहे. यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा प्रश्न आघाडीवर आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी दौरा करत बळीराजाला झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. 

अब्दुल सत्तार हे नांदेड दौऱ्यावर होते. जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या आढावा बैठकीत अब्दुल सत्तार यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या पाच दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया जुलैमध्ये संपली आहे. तथापि, काही भागात जुलैपासून मुसळधार पाऊसही पडला आहे आणि याचा हिशेब घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारकडून बाधितांसाठी मदत योजना तयार करण्यात येत आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यानंतर अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांनी रात्रीच्या अंधारात बांधावर जाऊन नुकसान पाहणी केल्यावरून टोला लगावला आहे. 

अंधारात पिकाचे नुकसान पाहणारे हे दिव्य पुरुष खरंच धन्य 

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा नांदेड भागात शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करायला कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे रात्री अंधारात गेले. अंधारात पिकाचे नुकसान पाहणारे हे दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत, असा खोचक टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. तत्पूर्वी अब्दुल सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. याबाबत बोलताना, अशोक चव्हाण यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला गेलो होतो. अशोक चव्हाण यांना मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्राविषयी चांगले ज्ञान आणि समज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीही त्यांना चांगली जाण आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्यासोबतच मी कृषिमंत्री म्हणून माझे खाते सांभाळण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेईन, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, यापूर्वी अमोल मिटकरींनी केलेल्या एका ट्विटमध्ये, सत्ताधाऱ्यांना वारंवार सांगावे लागते आहे, हे सरकार गोर गरिबांसाठी काम करते आहे, हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, याचं कारण "५० खोके एकदम ओके" हे  चांगलच झोंबलेलं दिसतंय, असा टोला लगावला. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAmol Mitkariअमोल मिटकरीAbdul Sattarअब्दुल सत्तारNandedनांदेड