शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Maharashtra Political Crisis: “दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत”; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 11:21 IST

Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाहणी दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचे पहिले अधिवेशन सुरू आहे. विरोधी बाकांवर बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नव्या शिंदे-फडणवीस सरकावर अनेक मुद्द्यांवरून टीका केली जात आहे. यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा प्रश्न आघाडीवर आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी दौरा करत बळीराजाला झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. 

अब्दुल सत्तार हे नांदेड दौऱ्यावर होते. जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या आढावा बैठकीत अब्दुल सत्तार यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या पाच दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया जुलैमध्ये संपली आहे. तथापि, काही भागात जुलैपासून मुसळधार पाऊसही पडला आहे आणि याचा हिशेब घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारकडून बाधितांसाठी मदत योजना तयार करण्यात येत आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यानंतर अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांनी रात्रीच्या अंधारात बांधावर जाऊन नुकसान पाहणी केल्यावरून टोला लगावला आहे. 

अंधारात पिकाचे नुकसान पाहणारे हे दिव्य पुरुष खरंच धन्य 

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा नांदेड भागात शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करायला कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे रात्री अंधारात गेले. अंधारात पिकाचे नुकसान पाहणारे हे दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत, असा खोचक टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. तत्पूर्वी अब्दुल सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. याबाबत बोलताना, अशोक चव्हाण यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला गेलो होतो. अशोक चव्हाण यांना मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्राविषयी चांगले ज्ञान आणि समज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीही त्यांना चांगली जाण आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्यासोबतच मी कृषिमंत्री म्हणून माझे खाते सांभाळण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेईन, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, यापूर्वी अमोल मिटकरींनी केलेल्या एका ट्विटमध्ये, सत्ताधाऱ्यांना वारंवार सांगावे लागते आहे, हे सरकार गोर गरिबांसाठी काम करते आहे, हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, याचं कारण "५० खोके एकदम ओके" हे  चांगलच झोंबलेलं दिसतंय, असा टोला लगावला. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAmol Mitkariअमोल मिटकरीAbdul Sattarअब्दुल सत्तारNandedनांदेड