शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीसांवर विठ्ठल नाराज आहे, त्यांनी पूजा करावी ही पांडुरंगाचीच इच्छा नव्हती”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 17:45 IST

Maharashtra Political Crisis: आता विठ्ठलाने एकनाथाला बोलावले, अन् ते पूजा करणार असून, हे शिवसेनेचे सरकार आहे, हे भाजपने स्वीकारावे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

अकोला: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित करत सर्वांनाच धक्का दिला. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळ अचंबित झाले. यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पूजा करावी, हे विठ्ठलाची इच्छा नव्हती, असे अमोल मिटकरी म्हणाले. 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपद गमावण्याची नामुष्की ओढवली. गेल्या पंधरा दिवसांमधील या घटनाक्रमांमुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. यानंतर आषाढी एकादशीला कोण पूजा करणार, यावरून तर्क-वितर्क लावले गेले. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून यंदा विठ्ठलाची पूजा देवेंद्र फडणवीस करतील, असे सूचित केले होते. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी शपथबद्ध झाले. यावरून अमोल मिटकरी यांनी टोलेबाजी केली. 

देवेंद्र फडणवीसांनी पूजा करावी अशी विठ्ठलाची इच्छा नव्हती

देवेंद्र फडणवीसांनी पूजा करावी, अशी विठ्ठलाची इच्छा नव्हती. आता विठ्ठलाने एकनाथाला बोलावले, अन् ते पूजा करणार आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. शासकीय पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा करणाऱ्यांचे सरकार राहणार की नाही, हा प्रश्न आहे, कारण सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनवाणीत ते आमदार अपात्र ठरल्यास, मग सर्व काही समोर येणार. मात्र देवेंद्रजींवर पांडुरंग नाराज आहे का, हा एक संशोधनाचा विषय आहे, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. 

दरम्यान, त्यामुळे आता आता चंद्रकांत पाटील यांनी उत्तर द्यावे, सरकार नेमके आहे कोणाचे भाजप की शिवसेना, भाजपचे आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का नाही, नसेल तर शिवसेनेचे आहे हे स्वीकारा. शिवसेनेचे सरकार पाच वर्षे टिकेल, अन् भलेही अंतर्गत कलह-गटबाजी असेल पण आज एकनाथ शिंदे हे एक शिवसैनिक म्हणून प्रत्येकाला आठवतात. अन् ते पूजा करणार आहे. अगोदरच या संदर्भात भाकीत केले होते की भाजपचा मुख्यमंत्री पूजा करणार नाही, आज ते खर ठरले, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAmol Mitkariअमोल मिटकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे