शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी अजितदादा स्पष्टच बोलले; म्हणाले, “निकाल काहीही लागला तरी...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 23:34 IST

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकार कोसळू शकेल, असा दावा करण्यात येत आहे. यावर अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकाल येऊ शकतो. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी याबाबत संकेत दिले आहेत. याबाबत आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत मोठे विधान केले आहे. 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत गुरुवारी निर्णय लागू शकतो. याबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते यावर भाष्य करत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडताना दिसत आहे. तर दुसरीकडे निकाल आमच्याच बाजूने लागणार असा दावा शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांकडून केला जात आहे. निकालानंतर आमदार अपात्र ठरले, तर सरकार कोसळेल, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. याबाबतही अजित पवार यांनी भाष्य केले आहे. 

आजच्या घडीला त्यांच्याकडे १४५ पेक्षा जास्त बहुमत आहे

आजच्या घडीला त्यांच्याकडे १४५ पेक्षा जास्त बहुमत आहे. मधल्या काळात खूप जणांनी वेगवेगळी वक्तव्ये केली की घटनाबाह्य सरकार वैगरे. पण ते सरकार चालवत आहेत, त्यांनी अर्थसंकल्प घेतला, बहुमताने बसलेल्या सरकारच्या अधिकारांचा ते पुरेपूर वापर करत असल्याचे आपण गेल्या अकरा महिन्यांपासून पाहत आहोत. १४५ आमदारांचे पाठबळ त्यांच्याकडे जोपर्यंत आहे, तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणण्यात अर्थ नाही, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

विधानसभेच्या अध्यक्षांकडेच हा निकाल देण्याची शक्यता 

ही गोष्ट घडली त्याला आता जवळपास अकरा महिने झाले. आपण सर्वजण वाट पाहात होतो की कधी निर्णय येतो. आता अखेर यावर निर्णय येणार आहे. निकाल काहीही लागला तरी माझे स्वतःच मत आहे की, सर्वोच्च न्यायालय यासंबंधीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्याची शक्यता असेल. काही मोठ्या वकिलांसोबत चर्चा केली त्यांनी सांगितले की, विधिमंडळातील ही बाब आहे त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांकडेच हा निकाल देण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे अजित पवार म्हणाले. 

 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAjit Pawarअजित पवार