शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

“कोणतीही अभिलाषा नाही, त्यांना सांगा मला काढून टाका”; छगन भुजबळ चांगलेच संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 13:51 IST

NCP Ajit Pawar Group Chhagan Bhujbal: मी एकटा नाही, ओबीसी बांधव माझ्या पाठिशी आहेत. बलंदड लोकांना ओबीसीत घुसवले जात आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

NCP Ajit Pawar Group Chhagan Bhujbal: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी नवी मुंबई येथे शक्तिप्रदर्शन केले. यानंतर मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आणि विजय गुलाल उधळत मराठा बांधव परतले. यानंतर आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी एक बैठकही घेतली. आमचे आरक्षण संपल्यात जमा आहे असे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी चांगलाच संपात व्यक्त केला. तुम्हाला वाटते का की, आम्ही जाणीवपूर्वक आरक्षणावर बोलत आहोत. आमच्या ओबीसीत बॅकडोअर लोक घुसवले जात आहेत. मी जाणीवपूर्वक हे केले आहे का, कोण हे करत आहे, त्याचा विचार करा. यात काय पीएचडी करायची आहे का, वाटेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत, या शब्दांत छगन भुजबळ यांनी निशाणा साधला.

कोणतीही अभिलाषा नाही, त्यांना सांगा मला काढून टाका

ओबीसी आरक्षणाची लढाई सरकारमध्ये राहून लढणार की बाहेर पडून लढणार, असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, ते माझ्या पक्षाने ठरवावे. मुख्यमंत्र्यांनी ठरवावे. मला त्याची काही चिंता नाही. ओबीसी प्रश्नाचे दु:ख आणि संताप आहे. त्यापुढे कोणतीही अभिलाषा नाही. त्यांना जाऊन सांगा तुम्ही यांना काढा म्हणून, मी एकटा नाही. माझ्या मागे ओबीसी समाज आहे. लाखो लोक आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाष्यावर बोलताना, फडणवीस भेटतील तेव्हा त्यांना सांगेन. मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या. त्यांना कशाला आमच्यात घुसवत आहात, त्यांना आरक्षण द्यायला सुरुवात झाली, हे आता थांबवा. ओबीसींचे आरक्षण जात आहे, याचे दु:ख आणि संताप आहे, अशी स्पष्ट भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.

कित्येक वर्षांनी मिळणारे आरक्षण समाप्त होत आहे

चांगले घर असले तरी झोपडी दाखवली जात आहे. शिक्षण असले तरी नाही म्हणून सांगितले जात आहे. नोकरी असली तरी दाखवली जात नाही. घरासमोर गाडी ट्रॅक्टर असली तरी मोलमजुरी करता म्हणून सांगितले जात आहे, असा मोठा दावा करत, इथे मंत्रिमंडळाचा हुद्द्याचा कसलाही संबंध नाही. ओबीसी बांधवांचे, भटक्यांचे कित्येक वर्षानी मिळणारे आरक्षण समाप्त होत आहे, याची आग मनात भडकत आहे, असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला.

दरम्यान, आमच्यात विविध जातींचे ३५० हून अधिक वाटेकरी होते. आता हजार वाटेकरी झाले. त्यामुळे वाटा कमी होणार, हे अगदी सरळ आहे. ओबीसींच्या ५४ टक्क्यांमध्ये आणखी २०-२५ टक्के घुसवले तेही बलंदड. भटके विमुक्त जमातीतील लोक असतील किंवा इतर ओबीसी जाती असतील या सर्वांचे आरक्षण आता बलदंड लोक घेऊन जाणार. आमचे आरक्षण संपल्यात जमा आहे असे वाटत आहे. त्यामुळेच मी बोलत आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षण