शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

“कोणतीही अभिलाषा नाही, त्यांना सांगा मला काढून टाका”; छगन भुजबळ चांगलेच संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 13:51 IST

NCP Ajit Pawar Group Chhagan Bhujbal: मी एकटा नाही, ओबीसी बांधव माझ्या पाठिशी आहेत. बलंदड लोकांना ओबीसीत घुसवले जात आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

NCP Ajit Pawar Group Chhagan Bhujbal: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी नवी मुंबई येथे शक्तिप्रदर्शन केले. यानंतर मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आणि विजय गुलाल उधळत मराठा बांधव परतले. यानंतर आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी एक बैठकही घेतली. आमचे आरक्षण संपल्यात जमा आहे असे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी चांगलाच संपात व्यक्त केला. तुम्हाला वाटते का की, आम्ही जाणीवपूर्वक आरक्षणावर बोलत आहोत. आमच्या ओबीसीत बॅकडोअर लोक घुसवले जात आहेत. मी जाणीवपूर्वक हे केले आहे का, कोण हे करत आहे, त्याचा विचार करा. यात काय पीएचडी करायची आहे का, वाटेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत, या शब्दांत छगन भुजबळ यांनी निशाणा साधला.

कोणतीही अभिलाषा नाही, त्यांना सांगा मला काढून टाका

ओबीसी आरक्षणाची लढाई सरकारमध्ये राहून लढणार की बाहेर पडून लढणार, असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, ते माझ्या पक्षाने ठरवावे. मुख्यमंत्र्यांनी ठरवावे. मला त्याची काही चिंता नाही. ओबीसी प्रश्नाचे दु:ख आणि संताप आहे. त्यापुढे कोणतीही अभिलाषा नाही. त्यांना जाऊन सांगा तुम्ही यांना काढा म्हणून, मी एकटा नाही. माझ्या मागे ओबीसी समाज आहे. लाखो लोक आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाष्यावर बोलताना, फडणवीस भेटतील तेव्हा त्यांना सांगेन. मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या. त्यांना कशाला आमच्यात घुसवत आहात, त्यांना आरक्षण द्यायला सुरुवात झाली, हे आता थांबवा. ओबीसींचे आरक्षण जात आहे, याचे दु:ख आणि संताप आहे, अशी स्पष्ट भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.

कित्येक वर्षांनी मिळणारे आरक्षण समाप्त होत आहे

चांगले घर असले तरी झोपडी दाखवली जात आहे. शिक्षण असले तरी नाही म्हणून सांगितले जात आहे. नोकरी असली तरी दाखवली जात नाही. घरासमोर गाडी ट्रॅक्टर असली तरी मोलमजुरी करता म्हणून सांगितले जात आहे, असा मोठा दावा करत, इथे मंत्रिमंडळाचा हुद्द्याचा कसलाही संबंध नाही. ओबीसी बांधवांचे, भटक्यांचे कित्येक वर्षानी मिळणारे आरक्षण समाप्त होत आहे, याची आग मनात भडकत आहे, असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला.

दरम्यान, आमच्यात विविध जातींचे ३५० हून अधिक वाटेकरी होते. आता हजार वाटेकरी झाले. त्यामुळे वाटा कमी होणार, हे अगदी सरळ आहे. ओबीसींच्या ५४ टक्क्यांमध्ये आणखी २०-२५ टक्के घुसवले तेही बलंदड. भटके विमुक्त जमातीतील लोक असतील किंवा इतर ओबीसी जाती असतील या सर्वांचे आरक्षण आता बलदंड लोक घेऊन जाणार. आमचे आरक्षण संपल्यात जमा आहे असे वाटत आहे. त्यामुळेच मी बोलत आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षण