शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
4
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
5
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
6
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
7
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
8
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
9
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
10
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
11
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
12
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
13
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
14
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
15
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

“PM मोदींनी काय केले आहे, ते राऊतांनी प्रत्यक्ष जनतेत जाऊन पाहावे”; अजितदादा गटाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 14:00 IST

Anil Patil Reaction On Sanjay Raut Statement: २०२४ काय, २०२९ मध्येही मतदान बॅलेट पेपरवर घ्यावे, अशी मागणी संजय राऊत कायम करत राहतील, असा टोला लगावण्यात आला आहे.

Anil Patil Reaction On Sanjay Raut Statement: चार राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालात तेलंगण वगळता भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. तीन राज्यांत भाजपने मोठा विजय मिळवला. पैकी दोन ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, असे म्हटले होते. याला आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी पलटवार केला आहे. 

चार राज्यांचा जनादेश समोर आला आहे. तेलंगणा वगळता इतर तीन राज्यांमध्ये वेगळा जनादेश आहे. जनादेशाचे स्वागत करायला हवे. परंतु लोकांच्या मनात शंका आहे. हे कसे शक्य झाले? विशेषतः मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये. लोकांच्या मनात शंका असेल तर ती दूर करावी. बॅलेट पेपरवर एक निवडणूक घ्यावी. फक्त एक निवडणूक घ्यावी आणि संशय दूर करावा, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

PM मोदींनी काय केले आहे, ते राऊतांनी प्रत्यक्ष जनतेत जाऊन पाहावे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलं आहे? हे संजय राऊत यांनी प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन पाहावं. येत्या २०२४ आणि २०२९ च्या निवडणुकीतही संजय राऊत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करतील. जेव्हा एखाद्या पक्षाचा पराभव होतो. तेव्हा जनतेचा जनादेश स्वीकारायला हवा. संजय राऊतांना काहीही कामे नाहीत. संजय राऊतांनी प्रत्यक्ष लोकांमध्ये जावे आणि पंतप्रधान मोदी यांचे काम पाहावे. राजकारण बाजूला ठेवून त्याकडे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल, लोक कोणाबरोबर आहेत. जनता भाजप किंवा एनडीए आघाडीबरोबर उभे आहेत. मात्र, संजय राऊतांचा हा आरोप कायम राहील, अशी टीका अनिल पाटील यांनी केली. 

दरम्यान, यापुढे २०२४ आणि २०२९ मध्येही मतदान बॅलेट पेपरवर घ्यावे, अशी मागणी संजय राऊत कायम करत राहतील. पण त्यांनी लोकांमध्ये जावे, लोक काय करतायत आणि त्यांना काय हवे आहे, याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला अनिल पाटील यांनी दिला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेस