नौदलाने मुंबईजवळ बुडत्या जहाजातून २० जणांना वाचवले

By Admin | Updated: June 22, 2015 11:52 IST2015-06-22T10:55:42+5:302015-06-22T11:52:43+5:30

नौदलाच्या अधिका-यांनी मुंबईतील समुद्रात बुडणा-या जहाजातून २० जणांची सुखरूप सुटका केली आहे. 'जिंदल कामाक्षी' असे या खासगी जहाजाचे नाव असून जहाजात अडकलेल्या २० प्रवाशांना वाचवण्यात जवानांना यश मिळाले.

The navy saved 20 people from a drowning ship near Mumbai | नौदलाने मुंबईजवळ बुडत्या जहाजातून २० जणांना वाचवले

नौदलाने मुंबईजवळ बुडत्या जहाजातून २० जणांना वाचवले

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - नौदलाच्या अधिका-यांनी मुंबईतील समुद्रात बुडणा-या जहाजातून २० जणांची सुखरूप सुटका केली आहे. 'जिंदल कामाक्षी' असे या खासगी जहाजाचे नाव असून जहाजात अडकलेल्या २० प्रवाशांना वाचवण्यात जवानांना यश मिळाले आहे. कोचीनहून मुंद्रा बंदराच्या दिशेने हे जहाज निघाले होते.
मुंबईपासून ४० नॉटिकल दूर समुद्रात असलेल्या या जहाजात पाणी शिरलं होतं. खराब हवामानामुळे जहाजाचा कंट्रोल रूमशी संपर्कही तुटत चालला होता. या बुडणा-या जहाजाता २० प्रवासी होते. आप्तकालीन स्थितीत जहाजावरून नौसेनेकडे मदत मागण्यात आली व त्यानंतर लगेच नौदलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने २० जणांचे प्राण वाचवले.

Web Title: The navy saved 20 people from a drowning ship near Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.