शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारनं दिलं नवरात्रीचं गिफ्ट, महागाई भत्त्यात केली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 22:24 IST

महागाई भत्तावाढ करुन राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना नवरात्रीचं गिप्ट दिलं आहे.

मुंबई, दि. 21 : केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तूर्तास महागाई भत्तावाढीवर समाधान मानावे लागणार आहे. महागाई भत्तावाढ करुन राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना नवरात्रीचं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

6 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांसह 16 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ही वाढ 1 जानेवारी 2017 पासून देण्यात येणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यातही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सात टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी महागाई भत्ता 132 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला होता. ऑगस्टपासूनचा वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात दिला जाईल. तर, त्यापूर्वीच्या 7 महिन्यांमधील वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे द्यायचा, याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.

केंद्रानं 12 तारखेला कर्मचारी व सेवानिवृत्त वेतनाधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये 1 टक्क्यानं वाढ केली होती, त्यामुळे कर्मचा-यांना मिळणारा महागाई भत्ता 4 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर जाणार आहे. 1 जुलैपासून  हा नवा नियम लागू होणार आहे. केंद्राच्या या निर्णयाचा 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 61 लाख सेवानिवृत्त वेतनधारकांना फायदा पोहोचणार असून, कर्मचा-यांची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होणार आहे. केंद्रानं महागाई भत्ता एका टक्क्यानं वाढवल्यामुळे आता कर्मचा-यांना मूळ वेतन 5 टक्क्यांनी वाढून मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या (8 महिन्यांच्या) जुलै 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता मिळणार आहे. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांनासुद्धा याची भरपाई देण्यात येणार असून, सरकारी तिजोरीवर 3,068.26 व 2,045.50 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारGovernmentसरकार